शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

मुख्य सचिवांविरुद्ध वॉरंट

By admin | Updated: September 16, 2014 01:22 IST

सुनावणीस अनुपस्थित : राष्ट्रीय हरित लवादाकडून गंभीर दखल

पणजी : गोवा पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीने एल. एल. नथुरमल खाण कंपनी, तसेच इतरांविरुद्ध राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्यावेळी राज्य सरकारतर्फे कोणीही उपस्थित न राहिल्याने लवादाने गंभीर दखल घेऊन मुख्य सचिव बी. विजयन यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट काढले आहे. खाण पूर्वस्थितीत आणण्यासाठी स्वत: मालक प्रयत्न करीत असताना राज्य सरकार त्याबाबत गंभीर नसल्याने लवादाने ताशेरे ओढले असून पुढील सुनावणी २६ सप्टेंबर रोजी ठेवली आहे. नथुरमल कंपनीची टीसी क्रमांक ५९/५३ ची खाण पूर्वस्थितीत आणण्यात यावी, यासाठी संघटनेने ही याचिका सादर केली होती. खाणीच्या खंदकांमध्ये पाणी साचल्याने परिसराला धोका निर्माण झाला आहे. माती कोसळण्याची तसेच शेतात पसरून शेती नष्ट होण्याची भीती आहे, असे संघटनेचे म्हणणे होते. खाण कंपनीचा असा दावा आहे की, मायनिंग प्लॅननुसार आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात आली आहे. या खाणीतून पाणी बाहेर जाऊ दिले जात नाही. ते शास्त्रीय पद्धतीने साठवून ठेवले जाते. या भागात ‘पंगारो’ सारख्या स्थानिक झाडांची लागवड करण्याचीही तयारी कंपनीने दर्शविली होती. खनिज काढल्याने तेथे निर्माण झालेले खंदक बुजविण्याची तसेच वृक्ष लागवड आणि अन्य उपाययोजना करण्यास आपण तयार आहे, तथापि राज्य सरकार आपल्याला हे काम करण्यासाठीही खाण भागात प्रवेश करू देत नाही, असे कंपनीचे म्हणणे होते. खंदक भरून, तसेच तेथे वृक्ष लागवड करून ही खाण पूर्वस्थितीत आणण्यासाठी जे काही करणे शक्य आहे ते करण्याची तयारी कंपनीने दाखवली होती; परंतु राज्य सरकारकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कंपनीच्या या प्रस्तावावर राज्य सरकारचे काय म्हणणे आहे, हे जाणून घेण्यासाठी सुनावणीला हजर राहावे याकरिता सरकारला नोटिस बजावण्यात आली; परंतु त्याकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आले. सरकारच्या वतीने सोमवारी कोणीही उपस्थित राहिला नाही. त्यामुळे न्यायमूर्ती यू. डी. साळवी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. जी. के. पांडे व बी. एस. साजवान यांच्या त्रिसदस्यीय लवादाने वरील आदेश दिला. (प्रतिनिधी)