शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

उपविभागीय जिल्ह्यांना अधिसूचनेची प्रतीक्षा

By admin | Updated: May 13, 2015 01:08 IST

उत्तर व दक्षिण या दोन्ही जिल्ह्यांसाठी उपविभागीय जिल्ह्यांंची सरकारने स्थापना करण्याच्या हेतूने अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमले आहेत

उत्तर व दक्षिण या दोन्ही जिल्ह्यांसाठी उपविभागीय जिल्ह्यांंची सरकारने स्थापना करण्याच्या हेतूने अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमले आहेत. उपजिल्हाधिकारी सरकारने नेमला असला तरी उपविभागीय जिल्ह्यांची अधिसूचना सरकारने जारी केली नसल्याने या अधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयात कामाविना बसण्याची वेळ आली आहे. दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात कामे करून घेण्यासाठी पणजी व मडगावात येणे त्रासदायक होत असल्यामुळे सरकारने जानेवारी महिन्यात उत्तर आणि दक्षिण गोव्यासाठी उपजिल्ह्यात विभागणी केली. उत्तर गोव्यात बार्देस आणि दक्षिण गोव्यात फोंडा असे दोन विभाग तयार करण्यात आले. तयार करण्यात आलेल्या विभागीय कार्यालयावर जिल्हाधिकारी कार्यालयातील अतिरिक्त जिल्हााधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांच्याकडे उपविभागीय कार्यालयाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला. हे अधिकारी आठवड्यातून दोनवेळा आपल्या कार्यालयात भेट देतात. त्यांची नेमणूक करून चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी उपविभागीय कार्यालय अधिसूचित केले नसल्याने त्यांना आपल्या कार्यालयात भेट देण्यापलीकडे काहीच काम देण्यात आलेले नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांना काहीच काम नसल्याने आपल्या कार्यालयात बसून राहावे लागत आहे. तसेच त्यांच्यासाठी अजूनपर्यंत योग्य असा कर्मचारी वर्ग सरकारने उपलब्ध केला नसल्याने त्यांची गैरसोय झाली आहे. या अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी देण्यात येणारे अधिकारी व उपविभागीय जिल्हा सरकारने अधिसूचित करण्याची गरज आहे, तरच त्याचा फायदा दोन्ही जिल्ह्यांंतील लोकांना मिळू शकतो.