शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

१0८ रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांचे वेतन थकले

By admin | Updated: September 20, 2015 01:59 IST

पणजी : जीव्हीके इएमआरआयने १0८ रुग्णसेवेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चतुर्थीपूर्वी देण्यात येणारे थकलेले वेतन व पगारवाढ अजूनही दिली नाही. याबाबत

पणजी : जीव्हीके इएमआरआयने १0८ रुग्णसेवेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चतुर्थीपूर्वी देण्यात येणारे थकलेले वेतन व पगारवाढ अजूनही दिली नाही. याबाबत कामगारांनी अनेक वेळा व्यवस्थापनाशी संपर्क साधला तसेच समितीशीही बोलणी केली. मात्र, कोणताही परिणाम झाला नाही. जीव्हीके इएमआरआय व्यवस्थापन गोवा राज्याबरोबरच इतर आठ राज्यांत सेवा पुरवितात. इतर सर्व राज्यांतील कर्मचाऱ्यांना चतुर्थीपूर्वीच थकबाकी वेतन दिले जाते. मात्र, यंदा गोव्यातील कर्मचाऱ्यांना ही थकबाकी देण्यात आली नाही. कंपनीने १0८ सेवा सुरू केल्यापासून गतवर्षीपर्यंत चतुर्थीपूर्वी कर्मचाऱ्यांना चतुर्थीपूर्व थकबाकी दिली होती. यंदाही तशीच दिली जाणार या आशेने कर्मचारी होते. व्यवस्थापनाअंतर्गत एकूण १९४ कामगार काम करतात. मात्र, चतुर्थीची तारीख उलटून गेल्यानंतरही कर्मचाऱ्यांना निराशेलाच सामोरे जावे लागले. तसेच दरवर्षी सप्टेंबरपूर्वी पगारवाढ करण्यात येते. यंदा पगारवाढीची प्रक्रियाही केली नसल्याने सूत्रांनी सांगितले. याबाबत कर्मचाऱ्यांनी समितीशी संपर्क साधला होता. समितीच्या सदस्यांनी व्यवस्थापनाशी बोलणी करून चतुर्थीपूर्वी कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळावी, अशी मागणी करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, समितीकडून थकबाकीचे वेतन मिळवून देण्यासाठी खास प्रयत्न झाले नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अजूनही १0८ रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थापन योग्य सोयीसुविधा पुरवत नसल्याची तक्रार नेहमीच कर्मचारी करत असतात. तसेच अपुऱ्या सोयी उपलब्ध करून या रुग्णवाहिका चालविल्या जात असल्याचेही कर्मचाऱ्यांनीच जनतेच्या नजरेसमोर आणून दिले होते. वेळोवेळी आधुनिक आणि आवश्यक यंत्रांनी रुग्णवाहिका अद्ययावत राहाव्यात म्हणून कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही छेडले होते. मात्र, त्याचा परिणाम काहीही झाला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. कर्मचाऱ्यांनी जीव्हीके इएमआरआय व्यवस्थापनाच्या विरोधात आवाज उठविल्यापासून कर्मचाऱ्यांची विविध तऱ्हेने सतावणूक करण्यात येते, असेही सूत्रांनी सांगितले. व्यवस्थापनाचा आणि सरकारचा लागेबंध असल्याने व्यवस्थापन चांगली सेवा देण्याबाबत लक्ष देत नाही. सरकारने व्यवस्थापनाच्या कारभारावर लक्ष द्यावे तसेच १0८ रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना मार्गी लावावे, अशी मागणीही काही कर्मचाऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)