शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

वादळग्रस्तांना आचारसंहिता बाधली

By admin | Updated: May 12, 2014 00:21 IST

वादळग्रस्तांना आचारसंहिता बाधली

सत्तरी : सत्तरी तालुक्यात ४ एप्रिल रोजी हाहाकार माजवणार्‍या वादळी वार्‍यात लाखोंचे नुकसान झाले असून महिना लोटला तरी वादळग्रस्तांपैकी अनेकांना अजून दमडीची मदत मिळालेली नाही. त्यात लोकसभा निवडणुकीवर नजर ठेवून वादळग्रस्तांना दिलेली आश्वासनेही एव्हाना हवेत विरली आहेत. तर सरकारी अधिकारी आचारसंहितेचे निमित्त पुढे करून वादळग्रस्तांना टोलवत आहेत. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत तरी नुकसानभरपाई मिळेल की नाही याबाबत वादळग्रस्त शंका उपस्थित करत आहेत. सत्तरी व डिचोली तालुक्यांत गेल्या ४ एप्रिल रोजी वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने हाहाकार माजवून कोट्यवधींचे नुकसान केले. अनेक घरांवर झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले. तसेच बागायती व इतर उत्पादनाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाले. तसेच वीज, टेलीफान, जलपुरवठा इत्यादी सरकारी मालमत्तेचेही प्रचंड नुकसान झाले. दरम्यान, वादळात नुकसान झालेल्या वादळग्रस्तांनी तलाठी व कृषी अधिकार्‍यांना आणून आपल्या नुकसानीचा पंचनामा करून घेतला. तसेच नुकसानभरपाई संदर्भातील शेकडो अर्जही भरून दिले; परंतु घरांची मोडतोड झालेल्या काही वादळग्रस्तांना उपजिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री आधार निधीतून तातडीची मदत करण्यात आली. मात्र, अजून शेकडो अर्ज तसेच पडून आहेत. विशेषत: कृषीसंदर्भातील नुकसानीचा एकही अर्ज निकालात काढलेला नाही, त्यामुळे नुकसानग्रस्त वादळग्रस्तांत अस्वस्थता पसरली आहे. याविषयी कृषी खात्याच्या विभागीय अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता वादळग्रस्तांनी दाखल केलेल्या दाव्यांपैकी सुमारे अडिचशे दावे पुढील कारवाईसाठी वाळपई मामलेदारांकडे पाठवल्याचे गेला महिनाभर सांगण्यात येते. मात्र, अजून एकाही वादळग्रस्त शेतकर्‍याला दमडीची मदत मिळालेली नाही. वादळग्रस्तांचे नुकसानभरपाई संदर्भातील बरेच अर्ज विभागीय कृषी कार्यालयात गेला महिनाभर पडून आहेत. अर्ज भरून घेतेवेळी योग्य पडताळणी न केल्याने या अर्जात अनेक त्रुटी आहेत. त्यात बरेच अर्जदार जमीन मालकी हक्कदार नसल्याने नुकसानभरपाईस हे अर्ज पात्र ठरत नाही, त्यामुळे या अर्जाचे काय करावे, हा प्रश्न अधिकार्‍यासमोर आहे. हे अर्ज फेटाळल्यास वादळग्रस्त भडकण्याची शक्यता असल्याने ते अर्ज कार्यवाहीविना अडवून ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी खात्यातील सूत्रांनी दिली. (खास प्रतिनिधी)