शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

1 तारखेपासून  प्रवेशबंदी न उठविल्यास गोव्यात जाणारी वाहने अडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 16:01 IST

कारवारच्या नागरिकांचा इशारा: गोवा प्रवेशासाठी कुठलीही सक्ती नको 

काणकोण: कर्नाटक राज्यातून गोव्यात येणाऱ्या व्यक्तींना कुठल्याही सक्तीविना प्रवेश करू द्यावा अशी मागणी घेऊन शनिवारी कारवारच्या सुमारे 200 नागरिकांनी पोळे चेक नाक्यावर निदर्शने केली. 1 सप्टेंबर पासून निर्बंध काढले गेले नाहीत तर कर्नाटकातून गोव्यात येणारी आणि गोव्यातून कर्नाटकात जाणारी सर्व वाहने अडविली जाणार असल्याचा इशारा दिला आहे.

सध्या कारवारहून  गोव्यात येणाऱ्यांना पोळे चेक नाक्यावर एक तर कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र द्यावे लागते किंव्हा दोन हजार रुपये भरून स्वतः ची चाचणी करून घ्यावी लागते. तिसरा पर्याय म्हणजे चाचणी न करता गोव्यात येऊन 14 दिवस विलग अवस्थेत राहावे लागते. या उलट गोव्यातून कारवारला जाण्यासाठी कुठलेही निर्बंध नाहीत.

हे सर्व निर्बंध काढून टाका अशी या नागरिकांची मगणी असून हे निर्बंध न काढल्यास गोव्यात अत्यावश्यक वस्तू घेऊन येणारी वाहनेही अडवून धरू. 5 सप्टेंबर नंतर आम्ही हे आंदोलन सुरू करू असा इशारा कारवार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रघु नाईक यांनी दिली.

सध्या गोव्यात सुमारे 30 हजार कारवारचे नागरिक स्थाईक झालेले असून रोज गोव्यात नोकरीसाठी येणाऱ्यांचे प्रमाण सुमारे 1 हजारच्या आसपास आहे. या निर्बंधामुळे कित्येकांना नोकरी करण्यासठी गोव्यात येता येत नाही असे ते म्हणाले. आंतरराज्य वाहतुकीवरील सर्व निर्बंध केंद्र सरकारने काढलेले असताना गोव्यातच प्रवेश करण्यासाठी असे निर्बंध का असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान या प्रश्नांत आता कारवारच्या भाजप आमदार रुपाली नाईक यांनी लक्ष घातले असून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे आपण बोलले असल्याचे त्यांनी सांगितले. 1 सप्टेंबर पासून हे सर्व निर्बंध उठविले जातील असे आश्वासन सावंत यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुढाकार घेऊन जर हे निर्बंध हटवीत असतील तर आम्ही त्यांचे आभारी आहोत. पण 1 सप्टेंबर नंतर हे निर्बंध हटले नाहीत तर आम्ही उग्र आंदोलन करू. सध्या या चेक नाक्यावरून मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकना कुणीही अडवत नाही. मग सामान्य लोकांनाच हे निर्बंध का?

- सतीश सैल, कारवारचे माजी आमदार

टॅग्स :goaगोवा