शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

गोव्यात भाजीच्या उत्पादनात पाच पटींनी वाढ; भातशेतीच्या बियाणांना दुप्पट मागणी- बाबू कवळेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 17:12 IST

कृषी संचालक नेव्हिल आफोंसो तसेच प्रकल्प अधिकारी चंद्रहास देसाई हेही यावेळी उपस्थित होते.

मडगाव: गोव्यात शेतीकडे पाहण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टीकोन बदलत आहे. यंदा राज्यातील भाजीच्या उत्पादनात पाच पटीने वाढ झाली आहे  अशी माहिती कृषी खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी सांगितले.

जागतिक अन्न दिवसानिमित्त मडगाव येथील कृषी कार्यालयात आयोजित केलेल्या खाद्यपदार्थ प्रदर्शनाचे यावेळी त्यांनी उद्घाटन केले. यावेळी त्यांच्या हस्ते कार्यालयाच्या बाहेर बाणावली जातीच्या नारळाच्या कवाथ्याचे रोपणही करण्यात आले. कृषी संचालक नेव्हिल आफोंसो तसेच प्रकल्प अधिकारी चंद्रहास देसाई हेही यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना कवळेकर म्हणाले, यावेळी कृषी खात्याकडून सवलतीच्या दरात मिळणाऱ्या भाज्यांच्या बियाणांची विक्री पाचपट वाढली तर भातशेतीचे बियाणे दुप्पट विकले गेले. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ज्या विविध योजना मार्गी लावल्या त्याचेच हे फलित असल्याचे ते म्हणाले. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांची आबाळ होऊ नये यासाठी कृषी कार्यालये बंद न ठेवता सेवा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यात सध्या कमी होत असलेल्या नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात यावे यासाठी खास बियाणे कृषी खात्याने तयार केले असून हा शेतमाल कृषी खातेच विकत घेते अशी माहिती त्यांनी दिली. यंदा पाऊस चांगला झाल्याने भात पीक चांगले झाले असून परतीच्या पावसामुळे काही शेतकऱ्यांची पिके कुजून गेली ही गोष्ट जरी खरी असली तरी त्यांना लगेच त्याची नुकसान भरपाई दिली जाईल असे कवळेकर यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा