शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यात 'वंदे भारत'; पेडणे ते काणकोण रेल्वेसेवेला लवकरच सुरुवात होणार: मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2025 13:31 IST

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे गोव्याला मोठा फायदा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पेडणे ते काणकोण रेल्वे स्थानकादरम्यान 'वंदे भारत' ही रेल्वे सेवा सुरू केली जाईल. त्यानंतर या सेवेचा विस्तार अन्य रेल्वे स्थानकांवरही करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पर्वरी येथे विधानसभा संकुलात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार आंतोनियो वास उपस्थित होते.

काणकोण ते पेडणे रेल्वे स्थानकादरम्यान ही रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांची चांगली सोय होईल. पण, रस्त्यावरील वाहतुकीचा ताणसुद्धा कमी होणार आहे. उत्तर व दक्षिण गोव्याला जोडण्यासाठी या सेवेची सुरुवात करण्यात येणार आहे. पेडणे ते काणकोणनंतर या रेल्वे सेवेचा विस्तार केला जाणार आहे. येत्या २ ते ३ वर्षांत गोव्यात ही रेल्वेसेवा सुरू होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे गोव्याला मोठा फायदा होणार आहे. यात विशेष करून वेलनेस टुरिझम, हेरिटेज टुरिझम, पायाभूत सुविधांचा विकास आदी क्षेत्रांना लाभ होईल. सबका साथ, सबका विकास हे ब्रीदवाक्य पुढे नेऊन या अर्थसंकल्पात भर दिला आहे. गोव्याला कोकण रेल्वे व दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कामांसाठी या अर्थसंकल्पात ४८२ कोटींची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले.

आयआयटीची पायाभरणी

गोव्यात आयआयटीसाठी कायमस्वरुपी कॅम्पस उभारला जाणार आहे. त्यासाठी जागा लवकरच निश्चित करून या प्रकल्पाची पायाभरणी केली जाईल. आयआयटी प्रकल्पासाठी स्वतंत्र अशी आर्थिक तरतूद केली जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

एनजीओंसाठी अतिरिक्त निधी दिला जाणार

ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम चालवणाऱ्या एनजीओ तसेच सामाजिक संस्थांना समाज कल्याण योजनेंतर्गत आता राज्य सरकार आता प्रती महिना २ लाख रुपयांचा विशेष निधी देणार आहे. या निधीमुळे त्यांना त्यांचे काम सुरळीतपणे करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मडगावहून तीन रेल्वे सुटणार

महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी गोव्यातून विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. राज्यातील भाविकांसाठी ६ फेब्रुवारीपासून ही मोफत रेल्वेसेवा सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा योजनेंतर्गत तीन रेल्वे सोडण्यात येणार आहेत. यामध्ये मडगावहून ६ रोजी सकाळी ८ वाजता रेल्वे निघेल. त्यानंतर दि. १३ व २१ रोजी रेल्वे सोडल्या जातील.

अर्थसंकल्पातून काय?

कर्ज मर्यादेत वाढ केल्याने गोव्यातील १७ हजार ५०० शेतकऱ्यांना लाभ एमएसएमईची क्रेडिट मर्यादा ५ कोटींहून १० कोटी आरोग्यक्षेत्राला प्रोत्साहन. गोमेकॉतील मेडिकल सीटसमध्ये वाढ. स्टार्टअप क्रेडित मर्यादेत वाढ केल्याने आदिवासी महिला उद्योजकांना लाभ

 

टॅग्स :goaगोवाVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसPramod Sawantप्रमोद सावंत