शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
5
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
6
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
7
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
8
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
9
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
10
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
11
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
12
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
13
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
14
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
15
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
16
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
17
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
18
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
19
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
20
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले

वालंकणी रेल्वे तिकीट वाढ जातीय अजेंड्यामुळे - प्रदेश कॉंग्रेसचा केंद्रावर आरोप

By admin | Updated: August 29, 2016 16:45 IST

वालंकणी फेस्ताच्या निमित्ताने विशेष रेलगाड्या सोडतानाच तिकीट 300 पटींनी वाढवून केंद्र सरकारने आपला जातीय अजेंडा पुढे रेटला असल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 29  -  वालंकणी फेस्ताच्या निमित्ताने विशेष रेलगाड्या सोडतानाच तिकीट 300 पटींनी वाढवून केंद्र  सरकारने आपला  जातीय अजेंडा पुढे रेटला असल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी केला आहे. 

ट्रॉजन यांनी सांगितले की वालांकणी फेस्तला गोव्यातून हजारो भाविक जात असतात. भाविकांची सोय व्हावी यासाठी ममता बँनर्जी रेल्वेमंत्री असताना कॉंग्रसने विशेष मेहनत घेतली होती. यंदा रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी आणखी विशेष सुविधा दिल्या असल्या तरी भरमसाठ भाडेवाढ करून या जत्रेला गोव्यातून कुणी जावूच नयेत याची खबरदारी घेतली आहे. 500 ते 550 रुपये पयर्यंत असलेली रेल्वेची तिकीट 2 हजार रुपयांपर्यंत वाढवून सामान्य माणसाला निराश केले आहे. भाजपच्या जातीय अजेंडाचा हा एक भाग असून गोवा सरकारही या बाबतीत मौन बाळगून आहे.  एवढेच नव्हे तर भाजपचे अल्पसंख्याक आमदारही या बाबतीत मुग गिळून आहेत असे ते म्हणाले.  सरकारच्या या कृतीचा कॉंग्रेस तीव्र निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गोवा  सरकारने आणि भाजपमधील अल्पसंख्याक समुदायाच्या आमदारांनीही याचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी त्यांनी केली. 
हा प्रकार म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्याचा भाग असल्याचा आरोपही त्यांनी केला. गोव्यात माध्यम मुद्यावर भाजप सरकार आणि संघाचे मतभेद असल्याचे जरी दाखविण्यात येत असले तरी संघ आणि भाजप एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती सल्याचे त्यांनी सांगितले. भाजप विरोधी मते विभागण्यासाठी हा डाव असल्याचे त्यांनी सांगितले.