शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

उत्पल एक दिवस पणजी जिंकेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 07:48 IST

मी धीर गोळा करून म्हणाले, "भाई, तुम्ही चुकलात. तुम्ही योग्यवेळी उत्पलला राजकारणात आणायला हवं होते."

नीना नाईक, पणजी

भाईंचा म्हणजे मनोहर पर्रीकर यांचा स्मृतिदिन पणजीत पार पडला. भाईच्या विचारातच मिरामारला पोचले. अनेक आठवणी मनात रेंगाळत होत्या. मी आणि दुर्गा भाईंच्या पुतळ्यासमोर उभ्या राहिलो. रात्रीची वेळ. भाईंची धीरगंभीर मूर्ती निरभ्र आकाशाखाली उभी आहे. समुद्राची गाज ऐकत, सळसळणारा वारा अंगावर घेत, रस्त्यावरची वाहतूक निरखत, असंख्य फुलांचे हार गळ्यात सांभाळत, डावीकडे बघणारी नजर, एक पाऊल पुढे टाकून कुठेतरी जायची घाई असल्यागत जणू भाईच समोर ताठमानेन उभे होते. आजूबाजूला नजर फिरवली.

चाफा दरवळून परिसर प्रसन्न करत होता. प्राजक्ताच्या आणि बकुळीच्या फुलांचा सडा समोर पडला होता. दोन्ही बाजूला दोन लाल फुलांची झाडं दरबान कशी अदबीने उभी होती. निसर्गाची इंद्र सभाच जणू, पुतळ्यापाशी नतमस्तक होताना त्यांच्या पायाशी 'नारळ' दिसला. आम्ही भाईच्या आठवणी जागवत तिथेच बसलो. 'भाईन आपैला' असा निरोप आला की कामात झोकून द्या. भाई सगळ्या कार्यकर्त्यांना सामावून घेत. भाईंना विरोधकांची कमतरता नव्हती. पण भाई त्यांना पुरून उरले. भाईंनी आग पाहिली, सापही पाहिले. पण त्यांची प्रतिकारशक्ती प्रचंड. आम्ही दोघी भाईंचे गुणगान गात होतो, पण भाईना स्तुती आवडत नसे. डोळ्यांचं पात लवतं न लवतं.. पुतळा हलतोय असा भास झाला. वायूगतीने एक तेजस्वी मूर्ती समोर उभी राहिली.

'सुटला गो!'.. अरे, हा तर भाईंचा आवाज. भाई बोलू लागले.. 'माझा पुतळा करून इथे पणजीचा राखणदार म्हणून उभं केलंय मला. पणजीची अवस्था मला पाहावत नाही. खड्डे, खोदकाम, धडधडणारे आवाज मला अस्वस्थ करतात. मला हाताची घडी घालून हे निमूटपणे पाहावं लागतं. झोडून काढायला हवं एकेकाला...' पुढे म्हणू लागले.. 'तुला ठाऊक आहे, काही आमदार मी जिवंत असताना माझ्या मरणाची याचिका घेऊन वरपर्यंत जाऊन कुरबूर करून आले. गरळ ओकून आले.' मी धीर गोळा करून म्हणाले, "भाई, तुम्ही चुकलात. तुम्ही योग्यवेळी उत्पलला राजकारणात आणायला हवं होते."

'अग्गो..' म्हणत भाईनी चष्मा परत डोळ्यावर लावला. 'उत्पल माझा मुलगा आहे. मी त्याला आयत्या बिळावर बसवणार नाही. तो माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे जाणार. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन मी राजकारणात आलो नाही. त्यानेही चढं उतार शिकले पाहिजेत. मी दिलेली अनुभवाची शिदोरी उत्पलकडे आहे. तुम्ही निःशंक राहा. उत्पल पणजीवर दुरून प्रेम करत नाही, श्वास घेणं जशी माणसाची गरज आहे, तशी पणजीशी एकरूप होणारी दुसरी योग्य व्यक्ती नाही. त्याची बुद्धी, संयम तो सार्थकी लावेल. आत्मिक सामर्थ्याने तो एकदिवस पणजी जिंकेल. उत्पल राजकारणी नाही, तो सामाजिक कार्य करू शकतो. तो मर्यादा, जीवनमूल्य पायाखाली तुडवणारा नाही. उत्पलने त्याचा स्वाभिमान विकलेला नाही. आता तो दिवस लवकर उगवेल.' क्षणभरात भाई दिसेनासे झाले. देव भेटल्याचा आनंद आमच्या मनात मावत नव्हता. आता पुतळ्यासमोर नारळ ठेवण्याचा अर्थ कळला. समाधीकडे पाहिलं.. पुतळा सोन्यासारखा चकाकत होता. काळ्याकुट्ट अंधारात त्यांचं तेज लखाखत होतं.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणUtpal Parrikarउत्पल पर्रिकरManohar Parrikarमनोहर पर्रीकर