शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

उत्पल एक दिवस पणजी जिंकेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 07:48 IST

मी धीर गोळा करून म्हणाले, "भाई, तुम्ही चुकलात. तुम्ही योग्यवेळी उत्पलला राजकारणात आणायला हवं होते."

नीना नाईक, पणजी

भाईंचा म्हणजे मनोहर पर्रीकर यांचा स्मृतिदिन पणजीत पार पडला. भाईच्या विचारातच मिरामारला पोचले. अनेक आठवणी मनात रेंगाळत होत्या. मी आणि दुर्गा भाईंच्या पुतळ्यासमोर उभ्या राहिलो. रात्रीची वेळ. भाईंची धीरगंभीर मूर्ती निरभ्र आकाशाखाली उभी आहे. समुद्राची गाज ऐकत, सळसळणारा वारा अंगावर घेत, रस्त्यावरची वाहतूक निरखत, असंख्य फुलांचे हार गळ्यात सांभाळत, डावीकडे बघणारी नजर, एक पाऊल पुढे टाकून कुठेतरी जायची घाई असल्यागत जणू भाईच समोर ताठमानेन उभे होते. आजूबाजूला नजर फिरवली.

चाफा दरवळून परिसर प्रसन्न करत होता. प्राजक्ताच्या आणि बकुळीच्या फुलांचा सडा समोर पडला होता. दोन्ही बाजूला दोन लाल फुलांची झाडं दरबान कशी अदबीने उभी होती. निसर्गाची इंद्र सभाच जणू, पुतळ्यापाशी नतमस्तक होताना त्यांच्या पायाशी 'नारळ' दिसला. आम्ही भाईच्या आठवणी जागवत तिथेच बसलो. 'भाईन आपैला' असा निरोप आला की कामात झोकून द्या. भाई सगळ्या कार्यकर्त्यांना सामावून घेत. भाईंना विरोधकांची कमतरता नव्हती. पण भाई त्यांना पुरून उरले. भाईंनी आग पाहिली, सापही पाहिले. पण त्यांची प्रतिकारशक्ती प्रचंड. आम्ही दोघी भाईंचे गुणगान गात होतो, पण भाईना स्तुती आवडत नसे. डोळ्यांचं पात लवतं न लवतं.. पुतळा हलतोय असा भास झाला. वायूगतीने एक तेजस्वी मूर्ती समोर उभी राहिली.

'सुटला गो!'.. अरे, हा तर भाईंचा आवाज. भाई बोलू लागले.. 'माझा पुतळा करून इथे पणजीचा राखणदार म्हणून उभं केलंय मला. पणजीची अवस्था मला पाहावत नाही. खड्डे, खोदकाम, धडधडणारे आवाज मला अस्वस्थ करतात. मला हाताची घडी घालून हे निमूटपणे पाहावं लागतं. झोडून काढायला हवं एकेकाला...' पुढे म्हणू लागले.. 'तुला ठाऊक आहे, काही आमदार मी जिवंत असताना माझ्या मरणाची याचिका घेऊन वरपर्यंत जाऊन कुरबूर करून आले. गरळ ओकून आले.' मी धीर गोळा करून म्हणाले, "भाई, तुम्ही चुकलात. तुम्ही योग्यवेळी उत्पलला राजकारणात आणायला हवं होते."

'अग्गो..' म्हणत भाईनी चष्मा परत डोळ्यावर लावला. 'उत्पल माझा मुलगा आहे. मी त्याला आयत्या बिळावर बसवणार नाही. तो माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे जाणार. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन मी राजकारणात आलो नाही. त्यानेही चढं उतार शिकले पाहिजेत. मी दिलेली अनुभवाची शिदोरी उत्पलकडे आहे. तुम्ही निःशंक राहा. उत्पल पणजीवर दुरून प्रेम करत नाही, श्वास घेणं जशी माणसाची गरज आहे, तशी पणजीशी एकरूप होणारी दुसरी योग्य व्यक्ती नाही. त्याची बुद्धी, संयम तो सार्थकी लावेल. आत्मिक सामर्थ्याने तो एकदिवस पणजी जिंकेल. उत्पल राजकारणी नाही, तो सामाजिक कार्य करू शकतो. तो मर्यादा, जीवनमूल्य पायाखाली तुडवणारा नाही. उत्पलने त्याचा स्वाभिमान विकलेला नाही. आता तो दिवस लवकर उगवेल.' क्षणभरात भाई दिसेनासे झाले. देव भेटल्याचा आनंद आमच्या मनात मावत नव्हता. आता पुतळ्यासमोर नारळ ठेवण्याचा अर्थ कळला. समाधीकडे पाहिलं.. पुतळा सोन्यासारखा चकाकत होता. काळ्याकुट्ट अंधारात त्यांचं तेज लखाखत होतं.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणUtpal Parrikarउत्पल पर्रिकरManohar Parrikarमनोहर पर्रीकर