शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बालरथावरील 844 कर्मचा-यांना बेकार करण्याचा डाव, सरकारवर आरोप, येत्या रविवारी संघटनेची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 19:16 IST

बालरथाच्या चालक आणि वाहकांबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलेले विधान हे त्यांना न शोभणारे आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा बालरथावरील 844 कर्मचा-यांना बेकार करण्याचा डाव असल्याचा आरोप गोवा ट्रेड युनियन कॉन्फिड्रेशनच्या अध्यक्षा स्वाती केरकर यांनी केला.

पणजी : बालरथाच्या चालक आणि वाहकांबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलेले विधान हे त्यांना न शोभणारे आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा बालरथावरील 844 कर्मचा-यांना बेकार करण्याचा डाव असल्याचा आरोप गोवा ट्रेड युनियन कॉन्फिड्रेशनच्या अध्यक्षा स्वाती केरकर यांनी केला. दरम्यान, येत्या रविवारी संघटनेच्या होणा-या बैठकीत संपाची तारीख, कायदेशीर ठरविली जाईल असे यावेळी सांगण्यात आले. 

विधानसभेत बालरथांच्या चालक आणि वाहकांच्या कायम करण्याच्या व इतर चार मुख्य मागण्या मान्य न करता त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले. गोवा ट्रेड युनियन कॉन्फिड्रेशन व युनायटेड बालरथ एम्प्लॉईज युनियनच्यावतीने सोमवारी आझाद मैदानावर पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी एम्प्लॉईज युनियनचे मुख्य सचिव शिवकुमार नाईक व चाळीच्यावर चालक-वाहक उपस्थित होते. 

केरकर म्हणाल्या की, समाजकल्याण खात्यातर्फे 2010 मध्ये बालरथ योजना सुरू झाली. बालरथाच्या चालकाला दहा हजार आणि वाहकांना (सहाय्यक) पाच हजार रुपये वेतन ठरविले. त्यानंतर या कर्मचा-यांनी महागाई वाढीमुळे मिळत असलेला पगार वाढवून द्यावा, यासाठी गतवर्षी संप पुकारला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या काळात शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट आणि मुख्याध्यापक असोसिएशनचे अध्यक्ष विलास सतरकर यांनी मध्यस्थी केल्याने हा संप मागे घेण्यात आला होता. त्यावेळी एक हजार रुपये चालकांना आणि पाचशे रुपये सहायकाला वाढ देण्याचे मान्य झाले होते. तरीही त्यातील काहीचजणांना ही वाढ मिळाली आहे. 

केरकर पुढे म्हणाल्या की, आता सरकार या कर्मचा-यांना कायम करण्याचे टाळत असून, त्यांच्या मागण्यांकडे पूर्णपणो दुर्लक्ष करीत आहे. महागाईच्या काळात त्यांची मागणी रास्त आहे. मुख्यमंत्री र्पीकर यांचा या कर्मचा-यांविषयी दाखविलेला दु:स्वास पाहता त्यांना हे कामगार बेकार बनविण्याचे आहे काय? मुख्यमंत्री या चालकांना मालक बनविणार असल्याचे सांगत असून, ते कोणत्यापद्धतीने करणार आहेत हे आपल्याला ज्ञात होत नाही. ज्या विद्यार्थ्यांना बालरथ सेवा पुरविली जाते, त्यांच्या पालकांनी सरकारला याबाबत प्रश्न विचारावा, असे आवाहन त्यांनी केले. 

येत्या रविवारी या संघटनेची बैठक होणार असून, त्यानंतर संपाची तारीख आणि कायदेशीर लढय़ाविषयी दिशा ठरविली जाईल, असे सांगण्यात आले. 

टॅग्स :goaगोवा