शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

राज्यातील बेरोजगारीचा दर ८.७ टक्के वाढला; विजय सरदेसाई यांची सरकारवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2024 12:18 IST

गुणवत्तेवर आधारित नोकऱ्यांसाठी लढण्याची आणि नोकरीतील घोटाळे उघडकीस आणण्याची शपथ घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : राज्यात बेरोजगारीचा दर ८.७ टक्के वाढल्याचा दावा गोवा फॉरवर्डचे प्रमुख तथा आमदार विजय सरदेसाई यांनी केला. फातोर्डा येथे आयोजित जॉब फेअरमध्ये त्यांनी बेरोजगारीवरून सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी, गुणवत्तेवर आधारित नोकऱ्यांसाठी लढण्याची आणि नोकरीतील घोटाळे उघडकीस आणण्याची शपथ घेतली.

बेरोजगारीचा प्रश्न सोडवायचा असेल तर युवकांनी हे भाजप सरकार समूळ उखडून टाकले पाहिजे, असे सरदेसाई म्हणाले. व्यासपीठावर नगरसेवक लिंडन परेरा, रवींद्र (राजू) नाईक, पूजा नाईक तसेच इतर नगरसेवक व वुई फॉर फातोर्डाचे कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात शिक्षणाबाबतीत मुली खूप पुढे असल्याचे निकालाच्या वेळी दिसून येते परंतु नोकऱ्यांच्या वेळी त्यातील २१.२ टक्के मुली नोकऱ्या करतात ५६ टक्के पुरुष नोकऱ्या करतात ८० टक्के मुली लग्न झाल्यानंतर घरी बसतात. राज्यात नोकऱ्या मिळणे खूप कठीण झाले आहे. कोणतेही मोठे उद्योग यायला तयार नाहीत. 

अनेक विद्यार्थी बंगळूर, पुणे येथे जातात. गोव्यात सात आयटी कॉलेज आहेत. परंतू आयटी पार्क नाही, अनेक फार्मा कंपन्या आहेत परंतु एकच फार्मा कॉलेज आहे. सरकार अपयशी झाल्यावर बेरोजगारांना २ हजार रुपये योजना आणणार आहे. सरकार केवळ नोकऱ्या घोटाळ्यात व ते लपवण्यावर गंभीर आहे. लोकांचे लक्ष वळविण्यासाठी पूर्वीची केस काढली जात असल्याची टीका सरदेसाई यांनी केली.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण