शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

उदय भेंब्रेंना बहुजनांचे वावडे; मगोपची जोरदार टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2025 08:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मगो पक्षाने कोंकणी व मराठी या दोन्ही भाषांमध्ये कधीच भेदभाव केला नाही. उदय भेंब्रे ...

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मगो पक्षाने कोंकणी व मराठी या दोन्ही भाषांमध्ये कधीच भेदभाव केला नाही. उदय भेंब्रे हे आता टीका करत आहेत. मात्र, आमदार होताना त्यांना मगोपची भूमिका माहिती नव्हती का? खरे तर त्यांना बहुजन समाजाचे वावडे आहे. हा समाज पुढे गेलेला त्यांना नको आहे, हेच त्यांच्या टीकेतून दिसत आहे, असा खोचक टोला मगो पक्षाचे नेते नारायण सावंत यांनी लगावला.

पणजी येथे काल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्याच्यासोबत पक्षाचे कार्याध्यक्ष प्रताप फडते व सचिव अनंत नाईक उपस्थित होते. जनमत कौलाला मगोने पाठिंबा दिला होता. त्यावेळीही मगोची तीच भूमिका होती व आताही तीच आहे. मगो पक्षाचे १७ वर्षे सरकार होते. मात्र, कधीही पक्षाने भाषेवरून भेदभाव केला नाही. मात्र, आता पुन्हा एकदा कोंकणी व मराठीवरून भाषावाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका सावंत यांनी केली.

सावंत म्हणाले की, मगो पक्षाचे सरकार असताना हिंदू, ख्रिश्चन यांच्यात भाषेवरून कधीही वाद पेटला नाही, कारण भाऊसाहेब बांदोडकर हे सर्वांना एकत्र घेऊन काम करायचे. मगो सरकारने कधीही भाषेवरून कोणाचाही द्वेष केला नाही. विरोधी पक्षाने सुद्धा सरकारच्या हातात हात घालून राज्याच्या विकासासाठी काम केले आहे.

कोंकणी व मराठीवरून कधीही दुजाभाव केला नाही. कोंकणी व मराठीला समान दर्जा मिळावा असेच वाटते. कोंकणी नको असे मगोने कधीच म्हटले नाही. आम्ही नेहमीच संस्कृती सांभाळली व कुणावरही भाषा लादली नाही. उदय भेंब्रे यांचा केवळ निषेध करीत नसून, त्यावर आमची आमची भूमिका ठामपणे मांडणार आहे. त्यासाठी लवकरच पक्षाची कार्यकारिणी बैठक बोलावली जाईल. मगोने कोकणीचा विकास केला नाही, अशी टीका होत आहे. हे चुकीचे आहे.

आमदार होताना भूमिका चुकीची वाटली नाही?

भेंब्रे आता भाषावादाला खतपाणी घालत आहेत. त्यांनी विलिनीकरणाच्या विषयावरून गोव्याचे पैसे, संपत्ती संपली, असे विधान केले आहे. तसे काहीच नाही. उलट भेंब्रे हे मगो पक्षाच्या मतांवर तेव्हा आमदार म्हणून निवडून आले होते, तेव्हा त्यांना मगोची भूमिका चुकीची वाटली नव्हती का? अशी टीका त्यांनी केली.

भाऊंनीच अस्मिता जपली : सुदिन ढवळीकर

वीजमंत्री व मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते सुदिन गढवळीकर काल 'लोकमत'शी बोलताना म्हणाले की, मुक्तीनंतर गोव्यात भारतीय संस्कृती व भारतीय अस्मिता जपण्याचे काम भाऊसाहेब बांदोडकर व मगो पक्षाने केले. मुंडकारांच्या घरांचे रक्षण व्हावे, कुळांच्या जमिनींचे रक्षण व्हावे म्हणून भाऊ, शशिकलाताई व मगो पक्षाच्या सरकारने कायदे केले. भाटकारशाहीचे वर्चस्व मगोपच्या सरकारने एकेकाळी मोडून काढले. यामुळे काही जणांचा अजून जळफळाट होतोय. सासष्टीतील मगोविरोधकांपैकी काही जण एकदाच आमदार झाले व मग लोकांनी त्यांना कायमचे दूर केले.

 

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण