शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

उदय भेंब्रेंना बहुजनांचे वावडे; मगोपची जोरदार टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2025 08:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मगो पक्षाने कोंकणी व मराठी या दोन्ही भाषांमध्ये कधीच भेदभाव केला नाही. उदय भेंब्रे ...

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मगो पक्षाने कोंकणी व मराठी या दोन्ही भाषांमध्ये कधीच भेदभाव केला नाही. उदय भेंब्रे हे आता टीका करत आहेत. मात्र, आमदार होताना त्यांना मगोपची भूमिका माहिती नव्हती का? खरे तर त्यांना बहुजन समाजाचे वावडे आहे. हा समाज पुढे गेलेला त्यांना नको आहे, हेच त्यांच्या टीकेतून दिसत आहे, असा खोचक टोला मगो पक्षाचे नेते नारायण सावंत यांनी लगावला.

पणजी येथे काल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्याच्यासोबत पक्षाचे कार्याध्यक्ष प्रताप फडते व सचिव अनंत नाईक उपस्थित होते. जनमत कौलाला मगोने पाठिंबा दिला होता. त्यावेळीही मगोची तीच भूमिका होती व आताही तीच आहे. मगो पक्षाचे १७ वर्षे सरकार होते. मात्र, कधीही पक्षाने भाषेवरून भेदभाव केला नाही. मात्र, आता पुन्हा एकदा कोंकणी व मराठीवरून भाषावाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका सावंत यांनी केली.

सावंत म्हणाले की, मगो पक्षाचे सरकार असताना हिंदू, ख्रिश्चन यांच्यात भाषेवरून कधीही वाद पेटला नाही, कारण भाऊसाहेब बांदोडकर हे सर्वांना एकत्र घेऊन काम करायचे. मगो सरकारने कधीही भाषेवरून कोणाचाही द्वेष केला नाही. विरोधी पक्षाने सुद्धा सरकारच्या हातात हात घालून राज्याच्या विकासासाठी काम केले आहे.

कोंकणी व मराठीवरून कधीही दुजाभाव केला नाही. कोंकणी व मराठीला समान दर्जा मिळावा असेच वाटते. कोंकणी नको असे मगोने कधीच म्हटले नाही. आम्ही नेहमीच संस्कृती सांभाळली व कुणावरही भाषा लादली नाही. उदय भेंब्रे यांचा केवळ निषेध करीत नसून, त्यावर आमची आमची भूमिका ठामपणे मांडणार आहे. त्यासाठी लवकरच पक्षाची कार्यकारिणी बैठक बोलावली जाईल. मगोने कोकणीचा विकास केला नाही, अशी टीका होत आहे. हे चुकीचे आहे.

आमदार होताना भूमिका चुकीची वाटली नाही?

भेंब्रे आता भाषावादाला खतपाणी घालत आहेत. त्यांनी विलिनीकरणाच्या विषयावरून गोव्याचे पैसे, संपत्ती संपली, असे विधान केले आहे. तसे काहीच नाही. उलट भेंब्रे हे मगो पक्षाच्या मतांवर तेव्हा आमदार म्हणून निवडून आले होते, तेव्हा त्यांना मगोची भूमिका चुकीची वाटली नव्हती का? अशी टीका त्यांनी केली.

भाऊंनीच अस्मिता जपली : सुदिन ढवळीकर

वीजमंत्री व मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते सुदिन गढवळीकर काल 'लोकमत'शी बोलताना म्हणाले की, मुक्तीनंतर गोव्यात भारतीय संस्कृती व भारतीय अस्मिता जपण्याचे काम भाऊसाहेब बांदोडकर व मगो पक्षाने केले. मुंडकारांच्या घरांचे रक्षण व्हावे, कुळांच्या जमिनींचे रक्षण व्हावे म्हणून भाऊ, शशिकलाताई व मगो पक्षाच्या सरकारने कायदे केले. भाटकारशाहीचे वर्चस्व मगोपच्या सरकारने एकेकाळी मोडून काढले. यामुळे काही जणांचा अजून जळफळाट होतोय. सासष्टीतील मगोविरोधकांपैकी काही जण एकदाच आमदार झाले व मग लोकांनी त्यांना कायमचे दूर केले.

 

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण