शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

सापांच्या विषाची गोव्यात मोठ्या प्रमाणात तस्करी

By admin | Updated: June 20, 2014 02:42 IST

राजेंद्र केरकर ल्ल केरी गोव्यातल्या गुन्हा अन्वेषण खात्याने काल वाळपई-सत्तरी येथे सर्पविषाची तस्करी करण्यात गुंतलेल्या महंमद सलीम शेख याला शिताफीने अटक केल्याने इथे

राजेंद्र केरकर ल्ल केरी गोव्यातल्या गुन्हा अन्वेषण खात्याने काल वाळपई-सत्तरी येथे सर्पविषाची तस्करी करण्यात गुंतलेल्या महंमद सलीम शेख याला शिताफीने अटक केल्याने इथे सापांच्या विषाची तस्करी करण्याच्या धंद्यात अडकलेल्यांचे बिंग उघडकीस आलेले आहे. गोव्यात यापूर्वी बऱ्याचदा सापांच्या विषाची तस्करी करण्याच्या धंद्यात गुंतलेल्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती; परंतु असे असताना काहीजण घरात किंवा बागायतीत आलेल्या सापांना पकडून त्यांचे विष काढून त्रयस्थ व्यक्ती किंवा टोळीमार्फत विषाची विक्री करत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. कातड्यांच्या निर्यातीसाठी सापांची जशी भारताच्या अन्य प्रांतात शिकार होते, अगदी त्याचप्रमाणे विषासाठी सापांना पकडण्याचा व्यवसायही छुप्यारितीने गोव्यात कार्यरत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. पुणे येथी सिरम इन्स्टिट्यूट, चेन्नई येथील किंग इन्स्टिट्यूट आणि विष प्रतिबंधात्मक लस तयार करणाऱ्या बऱ्याच प्रयोगशाळांना असे विष विकले जायचे. सर्पतज्ज्ञ रॉम व्हिटॅकर यांच्या मते, पकडून आणलेले साप मातीच्या थंड मडक्यात ठेवतात आणि काही वेळाने सापाची मान मागच्या बाजूने पकडून त्याला रबराच्या एका तक्त्यावर सरळ ठेवतात. त्या वेळी संतापलेला व घाबरलेला साप आपला बचाव करण्यासाठी रबरी तक्त्याला चावतो, तेव्हा त्याचे विष बाहेर येते. ते विष वाळवून त्याची भुकटी करून ते विकण्यात येते. गोव्यात आॅगस्ट २०१२ मध्ये फोंडा पोलिसांनी विषाच्या तस्करीत गुंतलेल्या एका टोळीला अटक करण्यात यश मिळवले होते. त्या वेळी पोलिसांनी या टोळीकडून सापाच्या विषाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असताना ९३० मिली विष हस्तगत केले होते. काल गुन्हा अन्वेषण खात्याने घातलेल्या छाप्यात पोलिसांनी एक लिटर सापाच्या विषासह महंमद शेख याला अटक केली असून या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे आणि सापाच्या विषाविषयी शास्त्रीय माहिती असलेल्या तज्ज्ञांच्या मदतीने चौकशी झाली तर साप पकडण्याच्या आणि त्यांना जीवदान देण्याच्या नावाखाली वावरणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेणे शक्य होईल. डिचोली येथील अ‍ॅनिमल रेस्क्यू स्क्वॉडचे अमृत सिंग यांनी सापांच्या विषाच्या तस्करीत गुंतलेल्या गुन्हेगारांना अटक करण्याबरोबर त्यांना अशा विषाचा इतक्या मोठ्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या स्रोतांचा रितसरपणे शोध घेण्याची गरज असल्याचे सांगितले. पुणे पोलिसांनी यापूर्वी शेख याला दोन बाटली सापांच्या विषासह फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. त्याला पुन्हा एकदा गोव्याच्या गुन्हा अन्वेषण खात्याने अटक खुद्द वाळपईत करण्यात आल्याने या परिसरात वावरत असणाऱ्या टोळीमार्फत त्याने हे कृत्य केले असले पाहिजे. सत्तरीतील म्हादई अभयारण्यात राजनाग, नाग, मण्यार, फुरसे, घोणस अशा एकापेक्षा एक जहरी सापांसाठी नैसर्गिक अधिवास असल्याने अशा गुन्हेगारी टोळीमार्फत सापांचे विष क्रूररितीने काढण्याचे तंत्र अवगत केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. गुन्हा अन्वेषण खात्याने राष्ट्रीय स्तरावर वन्य जीव प्रकरणातील गुन्ह्यांचा शोध घेणाऱ्या संस्थेची मदत घेतली तर अशा प्रकरणांच्या मुळाशी जाणे शक्य होईल.