शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांमुळे प्रशासनाचा बट्ट्याबोळ, पर्यटनाला फटका- रोहन खंवटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 19:35 IST

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे स्वत:च्या बुद्धीने विचारच करत नाहीत.

पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे स्वत:च्या बुद्धीने विचारच करत नाहीत. त्यामुळेच 144 कलम लागू करून सरकारने घोळ केला व त्याचा मोठा फटका गोव्याच्या पर्यटनाला बसला आहे, अशी टीका अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी शनिवारी येथे केली. मुख्यमंत्र्यांकडे योग्य अशा नेतृत्वाची क्षमताच नसल्याने सध्या प्रशासनाचा बट्टय़ाबोळ झाला आहे व राज्य कर्जात अडकले आहे, असेही खंवटेम्हणाले.

खंवटे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्याला दहशतवादापासून धोका असल्याने कलम 144 लागू करण्यात आल्याचे सरकारने अगोदर जाहीर केले होते. आता मुख्यमंत्री म्हणतात की- दहशतवादाचा धोकाच नाही व त्यामुळे कलम 144 मागे घेण्याचा विचार ते करतात. पाचच दिवसांत दहशतवादाचा धोका टळला काय असा प्रश्न येतो. नीट अभ्यास व विचार न करताच मुख्यमंत्री वागत असल्याने परिणाम पर्यटन क्षेत्रला भोगावे लागत आहेत.

माझे काही मित्र दरवर्षी कार्निव्हलवेळी गोव्यात येतात. त्यांनी यावेळी दहशतवादाचा धोका असल्याने व कलम 144 लागू झाल्याने आपण येत नाही असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी नुकताच अर्थसंकल्प मांडला व राज्याचा 353 कोटींचा शिलकी म्हणजे अतिरिक्त महसुलाचा अर्थसंकल्प असल्याचे सांगितले. मात्र आता पुन्हा सरकार कर्ज घेऊ लागले आहे. नुकतेच शंभर कोटींचे कर्ज घेतले गेले. सरकार कर्ज घेऊन ते पूर्वीच्याच कर्जावरील व्याज भरण्यासाठी तसेच कर्मचा:यांना वेतन देण्यासाठी वापरत आहे. राज्याचा महसुल कसा वाढवावा याचे कोणतेही नवे मार्ग मुख्यमंत्र्यांना सूचत नाही, असे खंवटे म्हणाले.

माविनच्या भावाला वाचवतात

कायदा व सुव्यवस्था पूर्ण बिघडली आहे. मुख्यमंत्री सध्या प्रकाश नाईक मृत्यू प्रकरणात मंत्री माविन गुदिन्हो यांच्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रकाशचा खून झालाय असा नवा कोन पोलिसांनी दिला व चौकशी भलत्याच दिशेने नेली आहे. विल्सन गुदिन्हो या प्रकरणातून सहीसलामत सुटावा यासाठी सरकारची ही धडपड आहे, असा आरोप खंवटे यांनी केला. बागा येथे ला कालिप्सो हॉटेलमध्ये गुंड घुसतात व पर्यटकांना, कर्मचाऱ्यांना ओलीस धरतात.

पोलिस तिथेही कमी पडले. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या आरक्षण प्रक्रियेतही मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप सुरू आहे. महालक्ष्मी बंगल्यावर बसून विरोधकांच्या ताब्यातील जिल्हा पंचायत मतदारसंघांचे आरक्षण बदलण्याचे काम सुरू आहे, असे खंवटे म्हणाले. अधिका:यांनी मुख्यमंत्र्यांकडे आरक्षणाविषयी कोणती फाईल पाठवली होती, त्याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. एकदा आरक्षण बदलून आल्यानंतर मग आम्ही सगळी स्थिती जाहीर करू, असाही इशारा खंवटे यांनी दिला.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा