शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

एकूण ५४० प्रभाग राखीव; ओबीसींसाठी ३५७ जागा

By admin | Updated: May 17, 2017 02:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : ११ जून रोजी होणारी पंचायत निवडणूक २६ दिवसांवर आलेली असताना सरकारने १८६ पंचायतींचे आरक्षण मंगळवारी

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : ११ जून रोजी होणारी पंचायत निवडणूक २६ दिवसांवर आलेली असताना सरकारने १८६ पंचायतींचे आरक्षण मंगळवारी जाहीर केले. एकूण १८६ पंचायतींमधील १५२२ प्रभागांप्रकी ५४० प्रभाग अर्थात ३५.५ टक्के प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. प्रभाग राखीवतेची अधिसूचना रात्री उशिरा जारी करण्यात आली. विद्यमान पंचायत मंडळाची मुदत २६ मे रोजी संपत आहे. त्यानंतर २७ मेपासून पंचायतीवर संबंधित पंचायतीच्या सरपंचांच्या रूपात प्रशासकाची नेमणूक करण्यात येणार आहे. पंचायत निवडणुकीची आचारसंहिता गुरुवार, १८ मेपासून लागू होणार आहे.५४० प्रभागांपैकी ओबीसींसाठी ३५७ प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. अनुसूचित जमातीसाठी १६८ प्रभाग राखीव ठेवले असून मागासवर्गीयांसाठी एकूण १५ प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. ४९० प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यातील १६७ महिलांचे प्रभाग विविध राखीवतेतील आहेत.पंचायत निवडणुकीसाठी मागासवर्गीयांना पहिल्यांदाच आरक्षण देण्यात आले असून एकूण १५ प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत. यातील ३ प्रभाग मागासवर्गीय महिलांसाठी ठेवण्यात आले आहेत. पेडणे तालुक्यात ८, डिचोली तालुक्यात ३, सत्तरीत २, सासष्टी व बार्देसमध्ये प्रत्येकी एक प्रभाग आरक्षित करण्यात आला आहे.अनुसूचित जमातीसाठी एकूण १६८ प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत. यातील ११४ प्रभाग पुरुषांसाठी, तर ५४ प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. इतर मागासवर्गीयांसाठी ३५७ प्रभाग आरक्षित ठेवण्यात आले आहेत. यातील २४७ प्रभाग पुरुषांसाठी, तर ११० प्रभाग महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. संबंधित पंचायतीतल्या प्रभाग संख्येच्या आधारावर महिलांना तसेच इतर राखीवता देण्यात आली आहे. ही राखीवता २०११च्या जनगणनेवर आधारित असल्याचे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले. न्यायालयाने पंचायत निवडणुकीची तारीख निश्चित केल्यानंतर राखीवता ठेवताना सरकारला बरीच कसरत करावी लागली. त्यातून योग्य प्रकारे मार्ग काढीत राखीवता देण्यात आल्याचे ते म्हणाले. पारदर्शक तसेच नि:पक्षपातीपणे निवडणूक होण्यासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने आरक्षण करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. या वेळी त्यांच्यासमवेत सचिव संजय गोयल व पंचायत संचालक संध्या कामत उपस्थित होत्या.नव्या पंचायत मंडळाच्या स्थिरतेवर आपण भर देणार असल्याचे गुदिन्हो म्हणाले. पंचायत स्तरावर स्थिरता यावी, संगीत खुर्चीचा खेळ बंद व्हावा, लोकांची विकासकामे व्हावीत, यासाठी वेळ पडल्यास पंचायत राज कायद्यात किंवा नियमात बदल करण्यात येणार असल्याचे या वेळी स्पष्ट केले.