शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

गोव्यात १८ हजार अर्जदारांना मार्च ३१ पर्यंत शौचालये, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 22:11 IST

मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींसोबत शनिवारी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. गोवा स्वयंपूर्ण करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी सर्व पंचायतींवर निवडून आलेले पंच व स्वयंपूर्ण मित्र यांना मार्गदर्शन केले. 

पणजी : राज्यातील ज्या कुटूंबांनी यापूर्वी शौचालयांसाठी अर्ज केले व शुल्कही भरले, अशा अर्जदारांना येत्या दि. ३१ मार्चपर्यंत शौचालयांची व्यवस्था करून दिली जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले. एकूण १८ हजार शौचालयांची व्यवस्था केली जाईल, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींसोबत शनिवारी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. गोवा स्वयंपूर्ण करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी सर्व पंचायतींवर निवडून आलेले पंच व स्वयंपूर्ण मित्र यांना मार्गदर्शन केले. 

स्वयंपूर्ण गोवा संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व पंचायत सदस्य व सरपंचांचे सहकार्य सरकारला हवे आहे. येत्या दि. २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व पंचायतींकडून स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाविषयी अहवाल अपेक्षित आहे. १५६ पंचायतींनी आतापर्यंत अहवाल सादर केला आहे. काही पंच व सरपंचांचे याविषयी अधिकाऱ्यांना सहकार्य मिळत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. सांगे तालुक्यातून सर्वात कमी पंचायतींचे अहवाल आले असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ज्यांना घर नाही व ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा व्यक्तींचा पंचायतींनी शोध घ्यावा. निधी वाया जाऊ नये म्हणून अशा व्यक्तींची दोन विविध पद्धतीने पंचायतींनी पडताळणी करून पहावी. माहितीची खातरजमा करून पहावी व मग निधी प्राप्त करून घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सूचविले.

गोवा मुक्तीशीसंबंधित अनेक ऐतिहासिक वास्तू व बांधकामे अनेक ठिकाणी आहेत. त्यापैकी एकही वास्तू ही नूतनीकरणाशिवाय किंवा दुरुस्तीशिवाय ठेवली जाऊ नये. दि. १९ डिसेंबर २०२१ पर्यंत अशा सर्व वास्तूंचे नूतनीकरण केले जावे. पंचायतींनी त्यासाठी शक्य तेवढ्या लवकर अशा बांधकामांची सरकारला माहिती द्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी

सांगितले.

पंचायतींना १०० कोटी (चौकट)

गोवा मुक्तीची साठ वर्षे साजरी करत असताना ग्रामपंचायतींनी विशेष प्रकल्पांचे काम हाती घ्यावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले व त्यासाठी पंचायतींना एकूण शंभर कोटींचे अनुदान जाहीर केले. केंद्राने जे तीनशे कोटी रुपये गोव्याला दिले आहेत, त्यातील शंभर कोटी रुपये ग्रामपंचायत क्षेत्रातील विकास प्रकल्पांसाठी वापरले जाणार आहेत.