शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

गोव्यात १८ हजार अर्जदारांना मार्च ३१ पर्यंत शौचालये, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 22:11 IST

मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींसोबत शनिवारी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. गोवा स्वयंपूर्ण करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी सर्व पंचायतींवर निवडून आलेले पंच व स्वयंपूर्ण मित्र यांना मार्गदर्शन केले. 

पणजी : राज्यातील ज्या कुटूंबांनी यापूर्वी शौचालयांसाठी अर्ज केले व शुल्कही भरले, अशा अर्जदारांना येत्या दि. ३१ मार्चपर्यंत शौचालयांची व्यवस्था करून दिली जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले. एकूण १८ हजार शौचालयांची व्यवस्था केली जाईल, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींसोबत शनिवारी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. गोवा स्वयंपूर्ण करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी सर्व पंचायतींवर निवडून आलेले पंच व स्वयंपूर्ण मित्र यांना मार्गदर्शन केले. 

स्वयंपूर्ण गोवा संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व पंचायत सदस्य व सरपंचांचे सहकार्य सरकारला हवे आहे. येत्या दि. २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व पंचायतींकडून स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाविषयी अहवाल अपेक्षित आहे. १५६ पंचायतींनी आतापर्यंत अहवाल सादर केला आहे. काही पंच व सरपंचांचे याविषयी अधिकाऱ्यांना सहकार्य मिळत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. सांगे तालुक्यातून सर्वात कमी पंचायतींचे अहवाल आले असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ज्यांना घर नाही व ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा व्यक्तींचा पंचायतींनी शोध घ्यावा. निधी वाया जाऊ नये म्हणून अशा व्यक्तींची दोन विविध पद्धतीने पंचायतींनी पडताळणी करून पहावी. माहितीची खातरजमा करून पहावी व मग निधी प्राप्त करून घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सूचविले.

गोवा मुक्तीशीसंबंधित अनेक ऐतिहासिक वास्तू व बांधकामे अनेक ठिकाणी आहेत. त्यापैकी एकही वास्तू ही नूतनीकरणाशिवाय किंवा दुरुस्तीशिवाय ठेवली जाऊ नये. दि. १९ डिसेंबर २०२१ पर्यंत अशा सर्व वास्तूंचे नूतनीकरण केले जावे. पंचायतींनी त्यासाठी शक्य तेवढ्या लवकर अशा बांधकामांची सरकारला माहिती द्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी

सांगितले.

पंचायतींना १०० कोटी (चौकट)

गोवा मुक्तीची साठ वर्षे साजरी करत असताना ग्रामपंचायतींनी विशेष प्रकल्पांचे काम हाती घ्यावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले व त्यासाठी पंचायतींना एकूण शंभर कोटींचे अनुदान जाहीर केले. केंद्राने जे तीनशे कोटी रुपये गोव्याला दिले आहेत, त्यातील शंभर कोटी रुपये ग्रामपंचायत क्षेत्रातील विकास प्रकल्पांसाठी वापरले जाणार आहेत.