शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

तीन लाख टन खनिज लपवले!

By admin | Updated: May 11, 2014 00:45 IST

पणजी : कावरे येथे बेकायदा खनिज व्यवसाय सुरू झाला असून, याचीच पुनरावृत्ती राज्यभर होण्याची भीती आहे.

पणजी : कावरे येथे बेकायदा खनिज व्यवसाय सुरू झाला असून, याचीच पुनरावृत्ती राज्यभर होण्याची भीती आहे. २००७ ते २०११ सालापर्यंत जे घडले होते, त्यापेक्षाही जास्त मोठे खनिज घोटाळे सुरू झाल्याचे कावरेवासियांचे म्हणणे असून, कावरे-पिर्ला येथे ३ लाख टन खनिज माल लपवून ठेवण्यात आला आहे, असा दावा ग्रामस्थांनी केला. कावरे येथील पंच सदस्य रवींद्र वेळीप यांनी ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्य सचिव, पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक, खनिज देखरेख समितीचे सदस्य परिमल राय व दक्षिण गोवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयांना निवेदन सादर केले आहे. वेळीप यांनी या निवेदनाची प्रत शनिवारी पत्रकार परिषदेत सादर केली. आम्ही सरकारच्या महसुलाची हानी होऊ नये; म्हणून सरकारला जागरूक करत आहोत. टीसी ५९-१ क्रमांकाच्या खनिज लिजमध्ये ७ लाख टन खनिज माल आहे. त्यापैकी फक्त २ लाख टन खनिज मालाचा ई-लिलाव पुकारण्यात आला. ज्या साठ्यातून सध्या खनिज माल काढला जात आहे, त्या साठ्यात फक्त १३ हजार ५०० टन खनिज माल आहे, अशी नोंद खाण खात्याने केली आहे. प्रत्यक्षात या मालाचे प्रमाण ५० हजार टन आहे, हे कुणीही पाहणी केल्यानंतर कळून येईल. याचप्रमाणे लिज क्षेत्रात आणखी अनेक खनिज साठे आहेत, असे वेळीप व अन्य ग्रामस्थांनी सांगितले. तीन लाख टन माल लपवून ठेवण्यात आला असून, लिलाव झालेल्या मालासोबत या मालाचीही वाहतूक केली जाणार आहे. हा माल चोरला जाणार आहे; कारण यापूर्वी इथेच बेकायदा खाण व्यवसाय झालेला आहे, असे वेळीप म्हणाले. टाकाऊ माल म्हणून मोठ्या प्रमाणात एके ठिकाणी खनिज साठा ठेवण्यात आला आहे. ज्या कामगारांना सेवेवरून यापूर्वी कमी करण्यात आले आहे, त्या कामगारांना या साठ्याची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार खनिज वाहतुकीवेळी खाण खात्याचा अधिकारी उपस्थित राहाणे गरजेचे असते. मात्र, खाण खात्यातर्फे कुणीच उपस्थित राहात नाही, असे वेळीप यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचा अशा प्रकारे सरकारच अवमान करत आहे, असे ते म्हणाले. वाहतुकीवेळी खनिज निरीक्षकाने उपस्थित राहायला हवे, असे २०१३ सालच्या खाण धोरणात म्हटले आहे. त्याचेही पालन होत नाही, असे वेळीप म्हणाले. सरकार कावरेतील खनिज माल हा लिलावानंतर स्वत:च्या मालकीचा असल्याचे सांगते. प्रत्यक्षात सरकारने अजूनही या मालाचा ताबा घेतलेला नाही. आमदार सुभाष फळदेसाई हेही कावरेतील खनिज व्यवसायात गुंतले आहेत. आम्ही गावाच्या हितासाठी लढत राहू. सरपंच राजेंद्र फळदेसाई तसेच अन्य कुणीच राजकारणी आमच्या लढ्यास पाठिंबा देत नसले, तरी बेकायदा खाण व्यवसायाविरुद्ध लढण्याचे कर्तव्य आम्ही पार पाडू. मुख्यमंत्री पर्रीकर हे याबाबत काहीच बोलत नाहीत, याबाबत आम्हाला मोठे आश्चर्य वाटते, असे वेळीप म्हणाले. (खास प्रतिनिधी)