शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

यंदाचा हंगाम काजू, आंबा पिकाला लाभदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2025 12:18 IST

यंदा चांगले पीक येण्याची शक्यता कृषी खात्यातर्फे वर्तविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : यंदाचा हंगाम काजू तसेच आंबा पिकाला लाभदायक राहणार आहे. काजूला लाभदायक अशी थंडी तसेच उष्णता असून, ग्रामीण भागात कलमी काजूला चांगला बहर आला आहे. त्यामुळे यंदा चांगले पीक येण्याची शक्यता कृषी खात्यातर्फे वर्तविली आहे.

राज्यात ग्रामीण भागात कलमी काजूला बहर आला असून, काही ठिकाणी या बहराला काजूगरही आले आहेत. गेले अनेक दिवस पडणारी थंडी ही काजू पिकाला लाभदायक आहे. त्यामुळे या बहराला चांगले काजू पीक येणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी काजूचे पीक चांगले येण्याची शक्यता आहे. आता काजू हंगाम सुरू झाला आहे.

आंब्यालाही चांगला बहर

राज्यात काजू बागायतीप्रमाणे आंब्याच्याही मोठ्या बागायती आहेत. मानकुराद आंब्याला तसेच इतर आंब्यांना चांगली मागणी असते. यावर्षी आंबा पिकाला चांगला बहर आला असून, याचा फायदा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. आंब्याचे पीक हे एप्रिल मे महिन्यापर्यंत मिळते. पण, आतापासूनच बहर आला आहे. त्यामुळे आंब्याचे पीक वाढण्याची शक्यता आहे.

चांगले वातावरण लाभदायक : कृषी संचालक

कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई म्हणाले, यावर्षी आतापर्यंत काजू, आंब्याला चांगला बहर आला आहे. सध्या पडत असलेली थंडी ही काजू पिकाला लाभदायक ठरली आहे. त्यामुळे बहुतांश कलमी काजूंना चांगला बहर आला आहे. तसेच गावठी काजूही चांगले बहरले आहेत. कलमी काजू पीक हे अगोदर मिळत असते, तर गावठी काजूचे पीक हे एप्रिल, मे महिन्यात जास्त मिळत असते.

 

टॅग्स :goaगोवाMangoआंबाMangoआंबाAgriculture Sectorशेती क्षेत्र