शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा हंगाम काजू, आंबा पिकाला लाभदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2025 12:18 IST

यंदा चांगले पीक येण्याची शक्यता कृषी खात्यातर्फे वर्तविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : यंदाचा हंगाम काजू तसेच आंबा पिकाला लाभदायक राहणार आहे. काजूला लाभदायक अशी थंडी तसेच उष्णता असून, ग्रामीण भागात कलमी काजूला चांगला बहर आला आहे. त्यामुळे यंदा चांगले पीक येण्याची शक्यता कृषी खात्यातर्फे वर्तविली आहे.

राज्यात ग्रामीण भागात कलमी काजूला बहर आला असून, काही ठिकाणी या बहराला काजूगरही आले आहेत. गेले अनेक दिवस पडणारी थंडी ही काजू पिकाला लाभदायक आहे. त्यामुळे या बहराला चांगले काजू पीक येणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी काजूचे पीक चांगले येण्याची शक्यता आहे. आता काजू हंगाम सुरू झाला आहे.

आंब्यालाही चांगला बहर

राज्यात काजू बागायतीप्रमाणे आंब्याच्याही मोठ्या बागायती आहेत. मानकुराद आंब्याला तसेच इतर आंब्यांना चांगली मागणी असते. यावर्षी आंबा पिकाला चांगला बहर आला असून, याचा फायदा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. आंब्याचे पीक हे एप्रिल मे महिन्यापर्यंत मिळते. पण, आतापासूनच बहर आला आहे. त्यामुळे आंब्याचे पीक वाढण्याची शक्यता आहे.

चांगले वातावरण लाभदायक : कृषी संचालक

कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई म्हणाले, यावर्षी आतापर्यंत काजू, आंब्याला चांगला बहर आला आहे. सध्या पडत असलेली थंडी ही काजू पिकाला लाभदायक ठरली आहे. त्यामुळे बहुतांश कलमी काजूंना चांगला बहर आला आहे. तसेच गावठी काजूही चांगले बहरले आहेत. कलमी काजू पीक हे अगोदर मिळत असते, तर गावठी काजूचे पीक हे एप्रिल, मे महिन्यात जास्त मिळत असते.

 

टॅग्स :goaगोवाMangoआंबाMangoआंबाAgriculture Sectorशेती क्षेत्र