शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

नेटवर्क शोधण्यासाठी रोज करावी लागते दोन किलोमीटरची पायपीट; ऑनलाईन शिक्षणाचे तीन तेरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 20:01 IST

नेत्रावळी अभयारण्य परिसरातील विद्यार्थ्यांचे हाल

मडगाव: लॉकडाऊच्या काळात शाळा आणि महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण हा परवलीचा शब्द बनला असला तरी नेत्रावळी अभयारण्य परिसरातील विद्यार्थ्यांना नेटवर्क मिळत नसल्याने ती मोठी अडचण बनली आहे. नेटवर्क मिळविण्यासाठी त्यांना रोज दोन किलोमीटरची पायपीट करत डोंगरमाथा गाठण्याची पाळी आली आहे.

नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील कुमारी, पोत्रे , भाटी या गावातील विद्यार्थ्यांची ही व्यथा आहे. त्यांच्या भागात मोबाईल टॉवर नसल्याने हे शिक्षण कसे घ्यावे हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा राहिला आहे. या गावातील सुमारे 20 ते 30 विद्यार्थी त्यासाठी रोज सकाळी आठ वाजता डोंगरमाथा चढू लागतात. डोंगर माथ्यावर आल्यानंतरच आम्हाला रेंज मिळते अशी माहिती वेर्णा येथे अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या नीलिमा येडको ह्या विद्यार्थिनीने सांगितले. दुपारी एक वाजता ही मुले खाली उतरून येतात पण दुपारी 2 वाजता त्यांना परत डोंगर चढावा लागतो. ज्यांची घरे दूर आहेत ती मुले जेवणाचा डबा घेऊनच येतात असे तिने सांगितले.

नेत्रावळी गावात बीएसएनएलचा मोबाईल टॉवर आहे पण तो व्यवस्थित चालत नाही त्यामुळे गावात कुणालाही रेंज असत नाही. जर काही उंचावर गेल्यास ही रेंज मिळू शकते त्यामुळेच ही मुले मुली एकत्र येऊन जंगल भागात रोज शिकायला जात असतात. 'आम्हाला माळरानात उघड्यावर बसून शिकावे लागते. जर पाऊस आला तर छत्रीच्या आडोशाला राहावे लागते. कित्येकवेळा पावसामुळे नेटवर्कची रेंज जाते, त्यामुळे पाऊस थांबण्याची आम्हाला वाट पाहावी लागते,' अशी माहिती केपे महाविद्यालयात शिकणाऱ्या पवित्रा गावकर हिने दिली.

हा जंगली भाग असल्याने साप आणि अन्य प्राणी या भागात फिरत असतात पण नाईलाजाने आम्हाला जीव धोक्यात घालून तिथे जावे लागते असे ती म्हणाली. याच भागात राहणाऱ्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्या राखी नाईक यांनी विद्यार्थ्यांच्या या समस्येवर सरकारचे लक्ष वेधले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून आपण हा विषय केंद्रीय दूरसंचार मंत्र्यापर्यंत पोहचविणार असल्याचे त्यांनी सांगितले.खरे तर या समस्येवर राज्य सरकार आणि स्थानिक खासदारांनी लक्ष घालून तोडगा काढण्याची गरज होती पण सगळे सुस्त बसले आहेत असे त्यांनी खेदाने म्हटले.

टॅग्स :goaगोवाStudentविद्यार्थी