शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नेटवर्क शोधण्यासाठी रोज करावी लागते दोन किलोमीटरची पायपीट; ऑनलाईन शिक्षणाचे तीन तेरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 20:01 IST

नेत्रावळी अभयारण्य परिसरातील विद्यार्थ्यांचे हाल

मडगाव: लॉकडाऊच्या काळात शाळा आणि महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण हा परवलीचा शब्द बनला असला तरी नेत्रावळी अभयारण्य परिसरातील विद्यार्थ्यांना नेटवर्क मिळत नसल्याने ती मोठी अडचण बनली आहे. नेटवर्क मिळविण्यासाठी त्यांना रोज दोन किलोमीटरची पायपीट करत डोंगरमाथा गाठण्याची पाळी आली आहे.

नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील कुमारी, पोत्रे , भाटी या गावातील विद्यार्थ्यांची ही व्यथा आहे. त्यांच्या भागात मोबाईल टॉवर नसल्याने हे शिक्षण कसे घ्यावे हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा राहिला आहे. या गावातील सुमारे 20 ते 30 विद्यार्थी त्यासाठी रोज सकाळी आठ वाजता डोंगरमाथा चढू लागतात. डोंगर माथ्यावर आल्यानंतरच आम्हाला रेंज मिळते अशी माहिती वेर्णा येथे अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या नीलिमा येडको ह्या विद्यार्थिनीने सांगितले. दुपारी एक वाजता ही मुले खाली उतरून येतात पण दुपारी 2 वाजता त्यांना परत डोंगर चढावा लागतो. ज्यांची घरे दूर आहेत ती मुले जेवणाचा डबा घेऊनच येतात असे तिने सांगितले.

नेत्रावळी गावात बीएसएनएलचा मोबाईल टॉवर आहे पण तो व्यवस्थित चालत नाही त्यामुळे गावात कुणालाही रेंज असत नाही. जर काही उंचावर गेल्यास ही रेंज मिळू शकते त्यामुळेच ही मुले मुली एकत्र येऊन जंगल भागात रोज शिकायला जात असतात. 'आम्हाला माळरानात उघड्यावर बसून शिकावे लागते. जर पाऊस आला तर छत्रीच्या आडोशाला राहावे लागते. कित्येकवेळा पावसामुळे नेटवर्कची रेंज जाते, त्यामुळे पाऊस थांबण्याची आम्हाला वाट पाहावी लागते,' अशी माहिती केपे महाविद्यालयात शिकणाऱ्या पवित्रा गावकर हिने दिली.

हा जंगली भाग असल्याने साप आणि अन्य प्राणी या भागात फिरत असतात पण नाईलाजाने आम्हाला जीव धोक्यात घालून तिथे जावे लागते असे ती म्हणाली. याच भागात राहणाऱ्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्या राखी नाईक यांनी विद्यार्थ्यांच्या या समस्येवर सरकारचे लक्ष वेधले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून आपण हा विषय केंद्रीय दूरसंचार मंत्र्यापर्यंत पोहचविणार असल्याचे त्यांनी सांगितले.खरे तर या समस्येवर राज्य सरकार आणि स्थानिक खासदारांनी लक्ष घालून तोडगा काढण्याची गरज होती पण सगळे सुस्त बसले आहेत असे त्यांनी खेदाने म्हटले.

टॅग्स :goaगोवाStudentविद्यार्थी