शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

मध्यरात्री खनिज वाहतूक होणार नाही; एजी देविदास पांगम यांची हायकोर्टात हमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2025 10:08 IST

पिळगाव भागात रात्रीच्या वेळी होणाऱ्या खनिज वाहतुकीविरोधात ग्रामस्थांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पिळगाव भागात रात्रीच्या वेळी खनिज वाहतूक होणार नाही. खनिज वाहतुकीसाठीच्या मार्गदर्शनतत्त्वांनुसार सायंकाळी ५.४५ वाजल्यानंतर खनिज सार वाहतुकीवर बंदी असून त्याचे काटेकोरपणे पालन केले जाईल, अशी हमी सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठात सोमवारी दिली.

पिळगाव भागात रात्रीच्या वेळी होणाऱ्या खनिज वाहतुकीविरोधात ग्रामस्थांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी न्यायालयात वाहतुकीबद्दल हमी दिली. त्याचप्रमाणे खनिज वाहतुकीसाठी ट्रक दुसऱ्या मार्गाचा वापर करीत असल्याविरोधात दाखल केल्याच्या याचिकेवर सोमवार, दि. २० रोजी सुनावणी होईल.

अॅड. अजय प्रभूगावकर म्हणाले, पिळगाव भागात वेदांता कंपनीकडून खनिज वाहतूक केली जात आहे. मार्गदर्शकतत्त्वानुसार खनिज वाहतूक संध्याकाळी ५.४५ पर्यंत केली जाऊ शकते. मात्र कंपनीकडून मध्यरात्री सुद्धाही वाहतूक केली जाते. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ही वाहतूक सुरू ठेवली जात असल्याने तिथे धूळ प्रदूषण, शेतीच्या नुकसानीसह अनेक गोष्टींना पिळगावसीयांना सामोरे जावे लागत आहे. याविरोधात न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

ग्रामस्थ म्हणतात...

खाण व्यवसायावर अनेकजण प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे अवलंबून आहेत. त्यामुळे खाण व्यवसाय सुरु राहावा, अशीच आमची इच्छा आहे. परंतु, नियमांचे उल्लंघन करून वाहतूक केल्यास ती खपवून घेतली जाणार नाही. शेतकरी तसेच स्थानिकांना सोबत घेऊन समतोल साधून ही खनिज वाहतूक व्हावी. मात्र आता स्थानिकांना खनिज वाहतुकीमुळे धूळ प्रदूषणाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, असे मत ग्रामस्थांनी मांडले.

आंदोलनाची दखल... 

रात्रभर सुरू असणाऱ्या खनिज वाहतुकीमुळे ग्रामस्थांनी एकत्र येत मोठे आंदोलन उभे केले. त्या आंदोलनाची दखल घेत आता वाहतुकीच्या वेळेत बदल करण्यात येत आहे.

परवानगी एका रस्त्याची अन् वाहतूक दुसरीकडून

खनिज वाहतुकीसाठी परवानगी देताना ती कुठल्या मार्गावरून वाहतूक केली जाईल हे नमूद करणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात कंपनी नमूद केलेल्या मार्गाचा वापर ने करता वेगळ्याच मार्गावरून खनिज वाहतूक करते. परवानगीमध्ये नमूद केलेल्या मार्गावर अडथळे असल्याने त्याचा वापर होऊ शकत नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यानुसार न्यायालयाने त्यांना त्यांची बाजू मांडण्यास सांगितल्याचे अॅड. प्रभूगावकर यांनी सांगितले.

...तर अवमान याचिका दाखल करणार

पिळगाव परिसरातून आता रात्रीची खनिज वाहतूक होणार नाही. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल, अशी हमी न्यायालयात दिली आहे. त्याची अंमलबजावणीही काटेकोरपणे व्हावी. परंतु जर तसे झाले नाही तर यावर अवमान याचिका दाखल केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. 

टॅग्स :goaगोवाHigh Courtउच्च न्यायालय