शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मध्यरात्री खनिज वाहतूक होणार नाही; एजी देविदास पांगम यांची हायकोर्टात हमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2025 10:08 IST

पिळगाव भागात रात्रीच्या वेळी होणाऱ्या खनिज वाहतुकीविरोधात ग्रामस्थांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पिळगाव भागात रात्रीच्या वेळी खनिज वाहतूक होणार नाही. खनिज वाहतुकीसाठीच्या मार्गदर्शनतत्त्वांनुसार सायंकाळी ५.४५ वाजल्यानंतर खनिज सार वाहतुकीवर बंदी असून त्याचे काटेकोरपणे पालन केले जाईल, अशी हमी सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठात सोमवारी दिली.

पिळगाव भागात रात्रीच्या वेळी होणाऱ्या खनिज वाहतुकीविरोधात ग्रामस्थांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी न्यायालयात वाहतुकीबद्दल हमी दिली. त्याचप्रमाणे खनिज वाहतुकीसाठी ट्रक दुसऱ्या मार्गाचा वापर करीत असल्याविरोधात दाखल केल्याच्या याचिकेवर सोमवार, दि. २० रोजी सुनावणी होईल.

अॅड. अजय प्रभूगावकर म्हणाले, पिळगाव भागात वेदांता कंपनीकडून खनिज वाहतूक केली जात आहे. मार्गदर्शकतत्त्वानुसार खनिज वाहतूक संध्याकाळी ५.४५ पर्यंत केली जाऊ शकते. मात्र कंपनीकडून मध्यरात्री सुद्धाही वाहतूक केली जाते. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ही वाहतूक सुरू ठेवली जात असल्याने तिथे धूळ प्रदूषण, शेतीच्या नुकसानीसह अनेक गोष्टींना पिळगावसीयांना सामोरे जावे लागत आहे. याविरोधात न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

ग्रामस्थ म्हणतात...

खाण व्यवसायावर अनेकजण प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे अवलंबून आहेत. त्यामुळे खाण व्यवसाय सुरु राहावा, अशीच आमची इच्छा आहे. परंतु, नियमांचे उल्लंघन करून वाहतूक केल्यास ती खपवून घेतली जाणार नाही. शेतकरी तसेच स्थानिकांना सोबत घेऊन समतोल साधून ही खनिज वाहतूक व्हावी. मात्र आता स्थानिकांना खनिज वाहतुकीमुळे धूळ प्रदूषणाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, असे मत ग्रामस्थांनी मांडले.

आंदोलनाची दखल... 

रात्रभर सुरू असणाऱ्या खनिज वाहतुकीमुळे ग्रामस्थांनी एकत्र येत मोठे आंदोलन उभे केले. त्या आंदोलनाची दखल घेत आता वाहतुकीच्या वेळेत बदल करण्यात येत आहे.

परवानगी एका रस्त्याची अन् वाहतूक दुसरीकडून

खनिज वाहतुकीसाठी परवानगी देताना ती कुठल्या मार्गावरून वाहतूक केली जाईल हे नमूद करणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात कंपनी नमूद केलेल्या मार्गाचा वापर ने करता वेगळ्याच मार्गावरून खनिज वाहतूक करते. परवानगीमध्ये नमूद केलेल्या मार्गावर अडथळे असल्याने त्याचा वापर होऊ शकत नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यानुसार न्यायालयाने त्यांना त्यांची बाजू मांडण्यास सांगितल्याचे अॅड. प्रभूगावकर यांनी सांगितले.

...तर अवमान याचिका दाखल करणार

पिळगाव परिसरातून आता रात्रीची खनिज वाहतूक होणार नाही. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल, अशी हमी न्यायालयात दिली आहे. त्याची अंमलबजावणीही काटेकोरपणे व्हावी. परंतु जर तसे झाले नाही तर यावर अवमान याचिका दाखल केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. 

टॅग्स :goaगोवाHigh Courtउच्च न्यायालय