शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

एक होती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद

By admin | Updated: September 20, 2014 01:20 IST

राज्यातील वास्तव : भाजप विद्यार्थी प्रकोष्ठचे विद्यापीठावर वर्चस्व

वासुदेव पागी-पणजी : राज्यात ‘विद्यार्थी चळवळ’ :हा विषय आला की, एक नाव न चुकता प्रामुख्याने घ्यावे लागेल ते म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. काही दशके आंदोलने आणि चळवळींनी इतिहास बनविलेल्या या संघटनेचे नाव आजच्या घटकेला निदान गोवा विद्यापीठाच्या क्षितिजावरून तरी नाहीसे झाले आहे. राष्ट्रीयत्व ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा घेऊन विद्यार्थी क्षेत्रात सक्रिय असलेल्या ‘अभाविप’ने १९९० ते २००८ या काळात राज्यभर दबदबा निर्माण केला होता. गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत कित्येक वेळा या संघटनेचा झेंडा फडकला होता. अशा या संघटनेचा आज राज्यातील एकाही महाविद्यालयात विद्यापीठ प्रतिनिधी नाही, ही वस्तुस्थिती आहे. हल्लीच झालेल्या ‘अभाविप’च्या गोव्यातील पीछेहाटीचे कारण विचारले असता, ‘अभाविप’चे एकेकाळी प्रदेशमंत्री म्हणून जबाबदारी असलेले लालजी पागी यांनी सांगितले की, संघटना पूर्वीसारखी गोव्यात सक्रिय नाही हे खरे आहे; परंतु त्यामुळे संघटनेचे काम थांबले, असे म्हणता येणार नाही. संघटनेचे काम सुरू असल्याचे ते सांगतात. केवळ विद्यापीठ निवडणुका हे संघटनेचे एकमेव उद्दिष्ट कधीच नव्हते. परिषदेच्या कामासाठी गोव्यात येणारे प्रचारक येणे बंद झाल्यामुळे कामाला मरगळ आल्याची प्रतिक्रिया परिषदेच्या एका पूर्वीच्या कार्यकर्त्याने व्यक्त केली. परिषदेच्या कामासाठी महाराष्ट्रातून पूर्णवेळ प्रचारक यायचे. अभय भिडे, आशिष भावे, मिलिंद आरोलकर, रत्नप्रभा राहाटे हे गोव्यात पूर्णवेळ काम केलेले प्रचारक. त्याचप्रमाणे गोव्यातून गोव्याबाहेरही प्रचारक जात होते. प्रचारकांचा ओघ थांबल्यामुळे कार्यकर्त्यांची नवीन फळी तयार झाली नाही. त्यामुळे जुने कार्यकर्ते आपापल्या व्यवसायात स्थिरावल्यानंतर कामही मंदावले. याचाच फायदा घेऊन भाजपमध्ये सक्रिय असलेले युवकांचे गट पुढे सरसावले आणि त्यांनी भाजप विद्यार्थी विभाग स्थापन करून त्याखाली विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकाही लढल्या. आज या गटाचे विद्यापीठावर वर्चस्व आहे. भाजपच्या विद्यार्थी विभागाने विद्यापीठावर वर्चस्व प्रस्थापित केले असले, तरी त्यांच्या कार्याचा आवाका हा एखादा अपवाद वगळता विद्यापीठ निवडणुकांच्या सीमा ओलांडणारा नाही. ‘अभाविप’ ही निवडणुका लढविण्याबरोबरच राष्ट्रीय आणि स्थानिक मुद्दे घेऊन आंदोलने करत होती. तसेच विद्यार्थ्यांशी संबंधित उपक्रम वर्षभर चालू असायचे. त्यामुळे ‘आताचा भाजप विद्यार्थी प्रकोष्ठ म्हणजे अभाविप,’ असा समज करून घेऊ नका, असा टोलाही एका जुन्या कार्यकर्त्याने हाणला. १९९१ आणि १९९२ अशी सलग दोन वर्षे अभाविपचे प्रदेशमंत्री म्हणून जबाबदारी पाहिलेले तसेच गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम केलेले कामगार नेते अजितसिंग राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना विद्यार्थी चळवळी आता राहिलेल्या नाहीत, असे सांगितले. ते म्हणाले, ‘आमच्या वेळी माझ्यासह माझ्याबरोबरच्या त्या वेळच्या कार्यकर्त्यांनी अगदी निष्ठापूर्वक आणि एक विचार घेऊन अभाविपचे काम केले होते. आज भाजप गोव्यातील सत्तास्थानी पोहोचलेला प्रबळ पक्ष असला, तरी त्या वेळी परिषद भाजपपेक्षा प्रबळ होती. आता भाजप विद्यार्थी प्रकोष्ठ म्हणून एक गट पुढे आला आहे. थेट एखाद्या राजकीय पक्षाचेच अंग बनून एखादी संघटना काम करते, तेव्हा ती सर्वसमावेशक बनू शकत नाही. शिवाय विद्यार्थी चळवळीत असताना केवळ विद्यार्थीहित, समाजहित आणि राष्ट्रहित या गोष्टीच पाहिल्या पाहिजेत. राजकीय आकांक्षांसाठी विद्यार्थी चळवळ हे प्राथमिक व्यासपीठ म्हणून वापरता कामा नये.’