शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कवळे पंचायत क्षेत्रातील भंगार अड्डे प्रकरणी पंचायत मंडळ सक्त 

By आप्पा बुवा | Updated: April 7, 2023 17:53 IST

कवळे ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या संख्येने भंगार अड्डे निर्माण झाले असून, लोकांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेऊन पंचायत मंडळांने सदर भंगार अड्ड्याविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे ठरवले आहे.

फोंडा कवळे ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या संख्येने भंगार अड्डे निर्माण झाले असून, लोकांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेऊन पंचायत मंडळांने सदर भंगार अड्ड्याविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे ठरवले आहे.

सरपंच मनूजा नाईक, उपसरपंच सुशांत कपिलेश्वरकर व इतर पंचमंडळाने गुरुवारी सर्व भंगार अड्डय़ाची पाहणी केली. यावेळी सरकारी अधिकारी सुद्धा त्यांच्याबरोबर उपस्थित होते.ज्यावेळी पंचायत मंडळाने भंगार अड्डय़ावर  पाहणी केली त्यावेळी काही धक्कादायक प्रकार उघडकीस आले. मुख्य म्हणजे काहीच परवानगी न घेता हे निर्माण करण्यात आले आहेत. या भंगार अड्डय़ा ठिकाणीच कामगारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर कामगार येथेच जेवण वगैरे करतात .ईथे रिकामी असलेली  रासायनिक बॅरल्स तसेच इतर औद्योगिक साहित्य आणले जाते. येथे गॅस सिलेंडर वापरून जेवण करण्यात येत असल्याने एका दिवशी ह्या रासायनिक बॅरल्सच्या संपर्कात येऊन मोठा स्फोट  होऊ शकतो. मोठी आग सुध्दा लागू शकते.

सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार सदर भंगारअड्डे प्रकरणी ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत. सदर तक्रारीची दखल घेऊनच भंगार अड्ड्यांची पाहणे करण्यात आलेली आहे.त्या म्हणतात इथले जे काही बेकायदेशीर प्रकार आहेत ते यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. या संबंधीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात  पाठवलेला असून त्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.मागची अनेक वर्षे भंगार अड्डे कवळे ग्रामपंचायत क्षेत्रात आहेत.  सदरची संख्या पंधराच्या वर आहे.वेळोवेळी ग्रामसभेत या विषयावरून बाचाबाची सुद्धा झालेली आहे. असे असतानाही एवढी वर्षे सदर भंगार अड्ड्यावर कारवाई का होत नाही हा प्रश्न आज उपस्थित होत आहे. कुणाच्या आशीर्वादाने हे सर्व चालू होते . असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.