शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

शिक्षण-तंत्रज्ञानाची सांगड हवी

By admin | Updated: September 15, 2014 01:39 IST

काकोडकर : कवळेच्या शांतादुर्गा शिक्षण समिती सुवर्ण महोत्सवानिमित्त परिषद

पणजी : सामाजिक विकासासाठी तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सामाजिक विकासासाठी शिक्षण आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणे आवश्यक आहे. आपल्याजवळ तंत्रज्ञानाबद्दलचा तुटवडा अजूनही असण्याचे कारण म्हणजे शिक्षण व संशोधन पद्धती, औद्योगिकता आणि प्रशिक्षित संस्थांचा अभाव मानला पाहिजे. शिक्षणाकडे पाहण्याची दृष्टी न बदलता एक योजनाबद्ध विकसित कार्य म्हणून पाहण्याची गरच आहे. म्हणूनच शिक्षण पद्धती समाजाची जडणघडण करणारी असावी, असे मत विख्यात शास्त्रज्ञ व गोव्याचे सुपुत्र डॉ. अनिल काकोडकर यांनी आपल्या बीजभाषणात व्यक्त केले. कवळे-फोंडा येथील श्री शांतादुर्गा शिक्षण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पणजीतील कला अकादमीत रविवारी आयोजिलेल्या ‘शिक्षण व समाज’ या विषयावरील परिषदेवेळी ते बोलत होते. प्रारंभी डॉ. रघुनाथ माशेलकरांनी आपल्या बीजभाषणाने परिषदेचा पाया घातला, तर काकोडकरांनी आपल्या बीजभाषणाचा कलश चढवून दोन दिवसीय परिषदेची सांगता केली. काकोडकर म्हणाले की, विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या योगदानाबद्दल कुतूहल बाळगणे आवश्यक आहे. शिक्षण पद्धतीत सर्वांगीण शैक्षणिक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. मुले करत असलेल्या विविध प्रयोगात त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. मनावर ठसवणारे कौशल्य शिक्षणात असले पाहिजे. शाळा, विद्यालय, महाविद्यालय व विद्यापीठात कौशल्य, हा शिक्षणाचा मुख्य अंतर्गत भाग होणे आवश्यक आहे. ७०% भारत अजूनही गावात आहे. अशा ठिकाणी दर्जेदार शिक्षण हा एक चर्चेचा मुद्दा आहे. शिक्षणात विद्यार्थी हा केंद्रबिंदू असला पाहिजे. एकूण उत्पादन क्षमता वाढवायची असेल तर शिक्षणात गुंतवणूक करणे योग्य ठरेल. ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात शिक्षित लोक आहेत, अशा ठिकाणी अधिक उत्पन्न वाढ होते. तंत्रज्ञान वाईट नाही, तर वाईट आहे ती आपली विचार क्षमता. त्यामुळे तंत्रज्ञानाचा फायदा करून घेणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान वापरासाठी दुसऱ्यावर अवलंबून असल्यास आपण तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करू शकत नाही. गोव्याला तंत्रज्ञानाची जाण आहे. त्याचा वापर योग्य झाल्यास गोवा देशासाठी एक आदर्श राज्य ठरू शकते, असेही ते म्हणाले. (विद्यार्थी प्रतिनिधी)