शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

शिक्षण-तंत्रज्ञानाची सांगड हवी

By admin | Updated: September 15, 2014 01:39 IST

काकोडकर : कवळेच्या शांतादुर्गा शिक्षण समिती सुवर्ण महोत्सवानिमित्त परिषद

पणजी : सामाजिक विकासासाठी तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सामाजिक विकासासाठी शिक्षण आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणे आवश्यक आहे. आपल्याजवळ तंत्रज्ञानाबद्दलचा तुटवडा अजूनही असण्याचे कारण म्हणजे शिक्षण व संशोधन पद्धती, औद्योगिकता आणि प्रशिक्षित संस्थांचा अभाव मानला पाहिजे. शिक्षणाकडे पाहण्याची दृष्टी न बदलता एक योजनाबद्ध विकसित कार्य म्हणून पाहण्याची गरच आहे. म्हणूनच शिक्षण पद्धती समाजाची जडणघडण करणारी असावी, असे मत विख्यात शास्त्रज्ञ व गोव्याचे सुपुत्र डॉ. अनिल काकोडकर यांनी आपल्या बीजभाषणात व्यक्त केले. कवळे-फोंडा येथील श्री शांतादुर्गा शिक्षण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पणजीतील कला अकादमीत रविवारी आयोजिलेल्या ‘शिक्षण व समाज’ या विषयावरील परिषदेवेळी ते बोलत होते. प्रारंभी डॉ. रघुनाथ माशेलकरांनी आपल्या बीजभाषणाने परिषदेचा पाया घातला, तर काकोडकरांनी आपल्या बीजभाषणाचा कलश चढवून दोन दिवसीय परिषदेची सांगता केली. काकोडकर म्हणाले की, विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या योगदानाबद्दल कुतूहल बाळगणे आवश्यक आहे. शिक्षण पद्धतीत सर्वांगीण शैक्षणिक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. मुले करत असलेल्या विविध प्रयोगात त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. मनावर ठसवणारे कौशल्य शिक्षणात असले पाहिजे. शाळा, विद्यालय, महाविद्यालय व विद्यापीठात कौशल्य, हा शिक्षणाचा मुख्य अंतर्गत भाग होणे आवश्यक आहे. ७०% भारत अजूनही गावात आहे. अशा ठिकाणी दर्जेदार शिक्षण हा एक चर्चेचा मुद्दा आहे. शिक्षणात विद्यार्थी हा केंद्रबिंदू असला पाहिजे. एकूण उत्पादन क्षमता वाढवायची असेल तर शिक्षणात गुंतवणूक करणे योग्य ठरेल. ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात शिक्षित लोक आहेत, अशा ठिकाणी अधिक उत्पन्न वाढ होते. तंत्रज्ञान वाईट नाही, तर वाईट आहे ती आपली विचार क्षमता. त्यामुळे तंत्रज्ञानाचा फायदा करून घेणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान वापरासाठी दुसऱ्यावर अवलंबून असल्यास आपण तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करू शकत नाही. गोव्याला तंत्रज्ञानाची जाण आहे. त्याचा वापर योग्य झाल्यास गोवा देशासाठी एक आदर्श राज्य ठरू शकते, असेही ते म्हणाले. (विद्यार्थी प्रतिनिधी)