शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
3
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
4
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
5
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
6
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
7
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
8
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
9
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
10
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
11
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
12
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
13
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
14
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
15
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
16
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
17
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
18
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
19
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
20
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...

चहा, जेवण मागणे हाही भ्रष्टाचारच

By admin | Updated: January 11, 2015 02:00 IST

लक्ष्मीकांत पार्सेकर : एक खिडकी योजनेचा प्रारंभ

पणजी : केवळ पैसे घेतले म्हणजेच भ्रष्टाचार होतो असे नाही, तर अधिकाऱ्यांनी चहा, जेवण वगैरे मागणे म्हणजेही भ्रष्टाचारच आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शनिवारी येथे एका सोहळ्यावेळी नमूद केले. अधिकारी काहीवेळा जेवणाचे व चहाचे बिल अर्जदारांकडून वसूल करू पाहातात. हे चुकीचे आहे. हाही भ्रष्टाचारच आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. अर्जदारांची कामे वेळेत करून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचा मार्ग अवलंबू नये, असे पार्सेकर म्हणाले. मालमत्तांच्या पार्टिशनसाठी एक खिडकी योजनेचा शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या आधारे उत्तर गोवा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर एक खिडकी योजना चालेल. संगणकीकृत प्रशासन पद्धत जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. या पद्धतीमुळे पार्टिशनची प्रक्रिया सुलभ झाली आहे. अशा प्रकारची पद्धत केवळ जिल्हाधिकारी कार्यालयापुरतीच मर्र्यादित न राहता अन्य खात्यांतील प्रमुखांनीही अशा प्रकारच्या योजना मार्गी लावाव्यात; जेणेकरून लोकांना दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. एक खिडकी योजना ही केवळ एकाच शासकीय कामापुरती मर्यादित असू नये, तर अन्य सर्व कामेही अशाच पद्धतीने व्हावी म्हणून सर्वांनी प्रयत्न करावा. केवळ एक खिडकीच नव्हे तर एक दरवाजा पद्धतही राबवावी, अशी सूचना मुख्यमंत्री पार्सेकर यांनी केली. लोकांना सर्व कामांसाठी उठसूठ शासकीय कार्यालयात खेपा माराव्या लागू नयेत. लोकांनी केलेल्या अर्जांची स्थिती काय आहे ते अर्जदारांना एसएमएसद्वारे आॅनलाईन पद्धतीने कळविले जायला हवे. यामुळे शासकीय कामात पारदर्शकताही येईल व भ्रष्टाचार कमी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारी अधिकाऱ्यांनी लोकांना जर चांगली सेवा दिली नाही व लोकांची कामे केली नाहीत तर त्याचा परिणाम सरकारच्या प्रतिमेवर होतो. सर्व सरकारी खाती व महामंडळांनी एकत्र यावे व आॅनलाईन पद्धतीने लोकांना अधिकाधिक सेवा पुरवाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. येथील मिनेझिस ब्रागांझा संस्था सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी महसूल खात्याचे प्रधान सचिव आर. के. श्रीवास्तव तसेच उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी नीला मोहनन, स्वप्नील नाईक, जीईएलचे दत्तप्रसाद नाईक या वेळी उपस्थित होते. आॅनलाईन पद्धतीने लोकांच्या दारापर्यंत शासकीय सेवा पोहचायला हव्यात, असे श्रीवास्तव म्हणाले. (खास प्रतिनिधी)