शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

भारतीय पासपोर्ट रद्द करण्याच्या प्रश्नावर तानावडे यांनी राज्यसभेत आवाज उठवला

By किशोर कुबल | Updated: December 9, 2023 05:25 IST

१९६१ साली गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाला. तत्पूर्वी गोव्यात जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाची नोंदणी पोर्तुगालमध्ये नोंद झालेली आहे

पणजी : पोर्तुगालमध्ये जन्म नोंदणी असलेल्या गोवेकरांचे भारतीय पासपोर्ट रद्द करण्याच्या प्रश्नावर राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी काल राज्यसभेत आवाज उठवला.

केवळ पोर्तुगालमधील जन्म नोंदणीवरुन भारतीय पासपोर्ट रद्द करणे अयोग्य असून  तानावडे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांना पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने ७० हून अधिक लोकांचे पासपोर्ट रद्द केल्याने चिंता वाढली आहे. या व्यक्तींना पोर्तुगीज सरकारकडून अधिकृत नागरिकत्व दस्तऐवज मिळेपर्यंत भारतीय पासपोर्टचे नूतनीकरण करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव मंत्रालयाला दिला आहे. तानावडे यांनी राज्यसभेत आवाज उठवल्याने पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी त्यांचे आभार मानले असून तानावडे यांनी घेतलेल्या सक्रिय भूमिकेचे स्वागत केले आहे.

याबाबतची पार्श्वभूमीची अशी आहे की, १९६१ साली गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाला. तत्पूर्वी गोव्यात जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाची नोंदणी पोर्तुगालमध्ये नोंद झालेली आहे. या नागरिकांना आता पासपोर्ट मिळवणे कष्टप्रद बनले आहे. पोर्तुगीज काळात जन्म नोंदणी असलेले आणि त्यानंतर पोर्तुगीज पासपोर्ट मिळवलेले अनेक राजकीय नेतेही निवडणूक लढविल्यानंतर गोत्यात आलेले आहेत. प्रकरणे कोर्टापर्यंत गेलेली आहेत