शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

पणजीत ट्रकचालकांचे आजपासून धरणे

By admin | Updated: July 30, 2016 02:50 IST

पणजी : गेल्या चार वर्षांपासून खाणग्रस्त भागातील पीडित ट्रकचालकांना सरकारतर्फे कोणतीही आर्थिक मदत देण्यात आली नाही.

पणजी : गेल्या चार वर्षांपासून खाणग्रस्त भागातील पीडित ट्रकचालकांना सरकारतर्फे कोणतीही आर्थिक मदत देण्यात आली नाही. सरकारला वारंवार निवेदने सादर केली गेली. आंदोलनेही केली तरी देखील सरकार ट्रकचालकांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने शनिवार (दि. ३०) पासून शंभरपेक्षा जास्त ट्रकचालक आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू करणार आहेत. प्रत्येक ट्रकचालकाला पाच लाख रुपये आर्थिक मदत ही मागणी मान्य होईपर्यंत; हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कामगार नेते अजितसिंग राणे यांनी सांगितले. खनिज पीडित घटकांमध्ये सरकारने काही मोजक्याच लोकांना आर्थिक सहकार्य दिले आहे. मात्र, आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही साधन नसलेल्या ट्रकचालकांना मात्र या योजनांमधून वगळण्यात आले आहे. ट्रेड कॉन्फडरेशनअंतर्गत साधारण ४५0 ट्रकचालक आहेत. यातील काही ट्रकचालक हे ५0 ते ६0 वर्षांकडे पोहोचलेले आहेत. झुकत्या वयाकडे पोहोचलेल्या या ट्रकचालकांना इतरत्र नोकरी करणे आणि मिळणेही कठीण बनले आहे. मात्र, सरकार या ट्रकचालकांच्या मागण्यांकडे सहानुभूतीने न पाहता त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्षच करत आले आहे. विधानसभेत सरकारने निर्णय घ्यावा यासाठी धरणे आंदोलन करून सरकारला मुदत देण्यात येत आहे. पुढील चार दिवसांत आझाद मैदानावर कामगारांची सभा होईल. या आमसभेत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. पुढील काही दिवसांत ट्रकचालकांच्या मागण्यांवर निर्णय दिला नाही; तर विधानसभेवर मोर्चा नेण्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असे राणे यांनी सांगितले.