शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

वीज दरवाढ पूर्णत: मागे घ्या, गोव्यात विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 20:47 IST

२00 युनिटपर्यंत वीज दरवाढ लागू न करण्याचा निर्णय सरकारी पातळीवर झाला असला तरी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर

पणजी : २00 युनिटपर्यंत वीज दरवाढ लागू न करण्याचा निर्णय सरकारी पातळीवर झाला असला तरी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी असमाधान व्यक्त केले असून ही दरवाढ पूर्णत: मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे. 

पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, ‘सर्वसाधारण जनतेचे कंबरडे आधीच वाढत्या महागाईमुळे मोडले आहे. त्यात वीज दरवाढीचा शॉक नकोच. शक्य असेल तर आणखी दर कमी करावेत. नोटबंदी, जीएसटी यामुळे देशभरात मंदीचे वातावरण आहे. गोव्याची अर्थव्यवस्थाही त्यात भरडली आहे. महागाईचा सामना करताना आधीच लोक मेटाकुटीला आली असताना वीज दरवाढ त्यांना मुळीच पेलवणारी नाही. ’

कवळेकर यांनी पुढे असाही आरोप केला की, याआधीही भाजप सरकारने राज्यात गुंतवणूक धोरणाच्या माध्यमातून ५0 हजार नोकºया निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते परंतु एकही नोकरी हे सरकार तयार करु शकले नाही. 

खाणींबाबत तोडग्याबाबत अभ्यासार्थ काँग्रेस विधिमंडळाने ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचे काम चालू आहे, अशी माहिती त्यांनी एका प्रश्नावर दिली. खाणी विनाविलंब चालू व्हाव्यात ही काँग्रेसचीही भूमिका आहे त्यासाठी सरकारला आमच्याकडून आवश्यक ते सहकार्यही दिले जात आहे परंतु सरकारच विरोधी आमदारांना विश्वासात घेत नाही. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ८८ खाण लीज रद्द करुन या सर्व लिजांचा लिलांव करण्याचा आदेश ७ फेब्रुवारीला दिला होता. त्यानंतर दीड महिना सरकारने काहीच हालचाली केल्या नाहीत, असा आरोप कवळेकर यांनी केला. 

सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याआधी त्याचा मसुदा विरोधी आमदारांना दाखवावा, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.