शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

टॅबलेट योजना अखेर गुंडाळली

By admin | Updated: May 13, 2015 01:06 IST

पणजी : सरकारने अखेर ‘सायबर एज’ योजनेखाली पाचवीच्या विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्याची योजना गुंडाळली आहे. तसा आदेशच शिक्षण खात्याकडून

पणजी : सरकारने अखेर ‘सायबर एज’ योजनेखाली पाचवीच्या विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्याची योजना गुंडाळली आहे. तसा आदेशच शिक्षण खात्याकडून जारी झाला असून टॅबलेटसाठी २०१३-१४ साली पाचवीच्या विद्यार्थ्यांकडून गोळा करण्यात आलेले प्रत्येकी शंभर रुपये आता ‘टर्म फी’ म्हणून ‘अ‍ॅडजस्ट’ करून घ्यावे, असे सर्व हायस्कुलांना खात्याने कळविले आहे.पार्सेकर सरकारने अधिकारावर आल्यानंतर पाचवीच्या मुलांना टॅबलेट देण्याच्या योजनेचा फेरआढावा घेणार असल्याचे जाहीर केले होते. तथापि, ही योजना सुरू ठेवली जावी, असे काहीजणांना वाटत होते. सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते व विद्यार्थ्यांना टॅबलेट देते; पण त्याचा काही उपयोग होत नाही, अशी तक्रार अनेक पालक आणि शिक्षकही व्यक्त करत होते. मुले टॅबलेटचा वापर करून गेम्स खेळतात. अभ्यास करत नाहीत. टॅबलेटचा व मुलांच्या शिक्षणाचा काही संबंधच येत नाही; कारण टॅबलेटशी मुलांचा अभ्यासक्रम सरकारने जोडलेला नाही, असे आक्षेपही घेतले जात होते. या पार्श्वभूमीवर सरकारने आता टॅबलेट देण्याचा निर्णय मागे घेतला आहे.२०१३-१४ साली जे विद्यार्थी पाचवीच्या वर्गात होते, ते आता सातवीत पोहोचले आहेत. या मुलांनी पाचवीत असताना भरलेले प्रत्येकी शंभर रुपये आता २०१५-१६ सालासाठी टर्म फी म्हणून नोंद करा, अशी सूचना शिक्षण खात्याने परिपत्रकातून सर्व सरकारी आणि अनुदानित हायस्कूलच्या व्यवस्थापनांना केली आहे.दरम्यान, टॅबलेट देणे बंद केले, तरी सरकार आता सर्व हायस्कुलांमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापन करणार आहे. पूर्वीचे सगळे संगणक काढून तिथे नवे बसविले जाणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक हायस्कूलसाठी वाचनालयाची, ग्रंथपालाची व सुरक्षा रक्षकाची सोय करावी, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ठरविले आहे. त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू झाली आहे.(खास प्रतिनिधी)