शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

विकसित गोवा मोहिमेला बळ द्या: मुख्यमंत्री सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2025 08:04 IST

कोसंबी विचार महोत्सव : गौर गोपाल दास यांच्या व्याख्यानाला प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोवा जशी कलाकारांची भूमी आहे, तशीच ती विचारवंतांचीही भूमी आहे. डी. डी. कोसंबी विचार महोत्सवाच्या माध्यमातून आपणाला विचारवंतांना ऐकण्याची संधी मिळते. त्यांचे विचार आत्मसात करून प्रत्येक गोमंतकीयाने विकसित गोवा मोहिमेला बळ द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

कला व संस्कृती खात्यातर्फे कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात आयोजित १४व्या डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात ते बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध वक्ते गौर गोपाल दास, खात्याचे सचिव सुनील आंचपिका, संचालक सगुण वेळीप उपस्थित होते.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रमुख वक्ते गौर गोपाल दास यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, जसे विमान टेक आऊट करते आणि नंतर विमानतळावर लैंडिंग करते तसेच जीवन आहे. विमानाचे यशस्वी लैंडिंग करणे आपल्या हातात नसते. कधी-कधी ते रनवेवर अपघातग्रस्त होते. तसेच जीवन यशस्वी लैंडिंग न करता म्हणजे आत्महत्या लोक करतात. म्हणून हा प्रवास सुखकारक होण्यासाठी सत्य ऐका, सत्य बोला, असे गौर गोपाल दास म्हणाले.

मंगळवारी (दि. २५) प्रसिद्ध कादंबरीकार अलका सरावगी यांचे 'अँड ईट सेज, सेव्ह मी फ्रॉम सुसाईड' या विषयावर व्याख्यान होणार आहे.

ताणतणाव सोडा; समजून घ्या

जीवन हे खूप सुंदर असून ताणतणाव घेऊन ते उदध्वस्त करू नका. आपल्या जीवनाचा प्रवास यशस्वी, सुंदर करायचा असेल तर ताणमुक्त जीवन जगा. स्पर्धात्मक जीवनात प्रत्येकजण यशस्वी होण्यासाठी ताण घेत आहे. मात्र, पालकांनी मुलांना तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजून घ्यायला हवे.

सभागृह हाऊसफुल्ल

गौर गोपाल दास यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी कला अकादमीचे दीनानाथ मंगेशकर सभागृह भरले होते. तर अनेक श्रोत्यांनी उभे राहून त्यांचे विचार ऐकले. तसेच कला अकादमी बाहेर स्क्रिन लावण्यात आली होती. त्या ठिकाणीही मोठी गर्दी होती.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत