शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

म्हादईबाबत जनजागृतीसाठी आयोजित पदयात्रा रोखणे ही लोकशाहीची हत्या; आरजीची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 15:46 IST

पदयात्रा अडविणाऱ्या स्थानिक पंच, सरपंचांवर त्यांनी टीका केली. 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: म्हादईबाबत जनजागृतीसाठी आयोजित पदयात्रा रोखणे म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, अशी प्रतिक्रिया रिव्होल्युशनरी गोवन्सचे नेते मनोज परब यांनी दिली आहे. पदयात्रा अडविणाऱ्या स्थानिक पंच, सरपंचांवर त्यांनी टीका केली. 

मनोज परब म्हणाले की, 'आमदार दिव्या राणे यांनी तसेच स्थानिक पंचायत मंडळांनी सत्तरीमध्ये म्हादईबाबत जनजागृती करण्यासाठी बाहेरच्यांची गरज नसल्याचे वक्तव्य केले. हे वक्तव्य निषेधार्ह आहे. सत्तरीमध्ये येण्यास कोणीच कुणाला अडवू शकत नाही. कोणीही अन्यायाविरुद्ध आवाज काढू शकतो. जे आज सत्तरीच्या विकासाची भाषा करतात, त्यांनी आमच्याबरोबर येऊन सत्तरी बघावी. आम्ही त्यांना खरा विकास दाखवून देऊ. कुठे कसा विकास झाला आहे, ते आम्ही दाखवून देऊ.' 

परब म्हणाले की, 'आज खरेतर सत्तेत असलेल्या राजकारण्यांनी म्हादईबाबत जनजागृती करण्यासाठी पदयात्रा, जनसभा आयोजित करायला पाहिजे होत्या. तसे न करता जे यासाठी आवाज उठवत आहे, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तरीमध्ये आमचे दहा हजार मतदार आहेत. त्यांच्यासह इतरांना जागे करण्यासाठी ही जनजागृती आहे. म्हादई नदी वाचली पाहिजे ही भावना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी म्हादईचा जास्तीत जास्त परिणाम होणाऱ्या गावांतील लोकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. मात्र, आम्हाला कोणीच अडवू शकत नाही.

दरम्यान, आरजीचे वकील धवल झावेरी यांच्याशी संपर्क साधला असता पदयात्रा ज्या कारणास्तव रोखली आहे, ते आक्षेप चुकीचे आहेत, असे सांगितले. आरजी पक्षाच्यावतीने सत्तरी तालुक्यातील ठाणे ते उसगाव अशी सुमारे १०० किलोमीटरची ही पदयात्रा काढण्यात येणार होती. सोमवारी पदयात्रेस सुरुवात झाल्यावर म्हाऊस-सत्तरी पंचायतीने त्यास आक्षेप घेतला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा