शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष, भारतीय संघ आशिया कपमध्ये खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
2
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
3
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
4
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
5
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
6
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
7
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
8
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
9
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
10
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
11
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
12
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
13
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
14
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
15
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
16
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
17
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
18
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
19
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
20
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका

राज्याने खाणबंदी उठवली

By admin | Updated: January 16, 2015 01:25 IST

खाण खात्याचा निर्णय : खाणी नव्याने सुरू होण्याचा मार्ग मोकळा, व्यावसायिकांना दिलासा

पणजी : शहा आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर १० सप्टेंबर २०१२ रोजी गोवा सरकारच्या खाण खात्याने राज्यातील सर्व खनिज खाणींसाठी लागू केलेला तात्पुरत्या निलंबनाचा आदेश अखेर गुरुवारी सरकारकडून रितसर मागे घेण्यात आला. निलंबनाचा आदेश आता सुरू ठेवण्याची गरज नसल्याचे खाण खात्याने नव्या आदेशात म्हटले आहे. २००७ ते २०१२ पर्यंतच्या काळात राज्याच्या खाण व्यवसाय क्षेत्रात प्रचंड बेकायदा गोष्टी घडल्या. त्यामुळे सुमारे ३५ हजार कोटींची हानी झाल्याचा अहवाल शहा आयोगाने दिला होता. तो संसदेत सादर झाल्यानंतर गोवा सरकारने राज्यातील सर्व खनिज खाण व्यवसाय तात्पुरता निलंबित केला जात असल्याचे जाहीर केले. तसा आदेश १० सप्टेंबर २०१२ रोजी जारी केला होता. गोव्यात त्या वेळी सुमारे ९० खनिज खाणींचा व्यवसाय प्रत्यक्ष सुरू होता. राज्य सरकारच्या आदेशानंतर लगेच आॅक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयानेही खनिज उत्खनन व वाहतूक बंदीचा आदेश लागू केला. न्यायालयाचा आदेश गेल्या वर्षी एप्रिलमध्ये न्यायालयाने मागे घेतला होता. त्यानंतर आता खाण खात्याने आपला आदेश मागे घेतला व यामुळे आता खनिज खाणी नव्याने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाकडे अर्ज करून पर्यावरणविषयक दाखले मिळविण्यासाठी अगोदर निलंबन आदेश मागे घेतला जाणे गरजेचे होते. तो मागे घेतला गेल्याने अनेक खनिज व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. एमएमडीआर कायद्याच्या कलम ८(३) नुसार लिजांचे नूतनीकरण करावे, असा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला व त्यानुसार लिजांचे नूतनीकरण केले आहे. त्यामुळे आता खाणींसाठी निलंबन आदेश कायम ठेवण्याची गरज राहिली नाही. (खास प्रतिनिधी)