शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
3
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
4
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
5
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
6
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
7
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
8
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
9
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
10
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
11
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
12
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
13
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
14
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
15
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
16
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
17
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
18
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
19
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
20
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश

कायद्याच्या चौकटीत राहून खाणी सुरू करा : फालेरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 22:03 IST

शहा आयोगाच्या अहवालाकडे तुम्ही दुर्लक्ष करता. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 7 फेब्रुवारी रोजी दिलेला निवाडा मात्र गुंडाळून ठेवू नका.

पणजी : शहा आयोगाच्या अहवालाकडे तुम्ही दुर्लक्ष करता. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 7 फेब्रुवारी रोजी दिलेला निवाडा मात्र गुंडाळून ठेवू नका. राज्यातील खनिज खाणी सुरू करण्यासाठी काँग्रेस पक्ष पाठिंबा देईल. पण कायद्याच्या चौकटीत राहून खाणी सुरू करा,  अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार लुईझिन फालेरो यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

खाणी, वन आदी खात्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या अनुदानित मागण्यांना कपात सूचना मांडल्यानंतर फालेरो बोलत होते. लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी असताना काही वर्षापूर्वी तुम्ही अहवाल तयार केला होता व गोव्यातील 50 टक्के खनिज खाणी बेकायदा असल्याचे म्हटले होते, असे फालेरो यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना उद्देशून सांगितले. बेकायदा खनिज निर्यातीमुळे गोव्याला हजारो कोटींची हानी झाल्याचेही तुमच्या समितीच्या अहवालात म्हटलेले आहे. 1 लाख 40 हजार झाडे खनिज खाणींसाठी कापली गेली असेही तुम्ही नमूद केले होते.2005 सालापासून राज्यात खनिज खाणी चालत असताना ब-याच बेकायदा गोष्टी घडल्या व 15 दशलक्ष टन खनिज माल बेकायदा पद्धतीने गोव्याहून निर्यात झाला असेही तुम्ही म्हटले होते, अशी आठवण फालेरो यांनी पर्रीकर यांना करून दिली. वनक्षेत्रातील 32 खनिज खाणींकडे आवश्यक परवाने नाहीत असेही तुम्ही पीएसी अहवाल म्हटलेले असल्याचे फालेरो म्हणाले. आता नव्याने खनिज खाणी सुरू करायलाच हव्यात. पण कायद्याच्या चौकटीत राहून त्या सुरू करा. कारण खनिज संपत्ती ही नैसर्गिक संपत्ती गोव्यातील लोकांची आहे. ती पुढील पिढीचीही आहे. कोळसा खाणींबाबत केंद्राने लिलाव पुकारला, टू-जी स्पेक्ट्रमबाबतही न्यायालयाने लिलाव पुकारायला सांगितले व खनिज खाणींबाबतही लिलाव पुकारणे न्यायालयाला अपेक्षित आहे, असे फालेरो म्हणाले.

आमदार प्रतापसिंग राणे हेही खनिज खाणींविषयी बोलले. खाणी खूप पूर्वीपासून आहेत. आपण दहा वर्षांचा होतो, तेव्हाही खनिज मालाची निर्यात पाहिली होती. खाणी बंद झाल्याने फक्त श्रीमंतांनाच फटका बसला असे नाही तर गरीब माणसांचीही उपजीविका बुडाली. आम्ही ठराविक नियंत्रण लागू करून खाणी सुरू करायला हव्यात. पर्यावरणास हानी न पोहोचविता खाणी चालायला हव्यात. राज्याचे अजून वन धोरण सुद्धा तयार झालेले नाही, असे राणे म्हणाले. खनिज खाणी येत्या ऑक्टोबरमध्ये सुरू करण्याची ग्वाही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिलेली आहे, असे सावर्डेचे आमदार दीपक प्रभू पाऊसकर यांनी सांगितले. जिल्हा मिनरल फंडमधून खाणग्रस्त भागातील लोकांना पिण्याचे पाणी पुरविले जावे तसेच विद्यालयांसाठी बस वाहतुकीची व्यवस्था व्हावी, अशी मागणी पाऊसकर यांनी केली.सावर्डे मतदारसंघातील कर्मचा-यांना फक्त सेझागोवा कंपनीने सेवेतून कमी केलेले नाही पण अन्य कंपन्यांच्या कर्मचा-यांना सेवेतून कमी केले आहे. आपल्याकडे चार कामगार संघटनांची निवेदने आली. आपण ती मुख्यमंत्र्यांकडे पाठवून दिली आहेत, असे पाऊसकर यांनी सांगितले. या कामगारांना जिल्हा मिनरल फंडातून मदत केली जावी. सरकारने बेकायदा खाण धंदा केलेल्या खनिज खाणींना बी कॅटेगरीमध्ये समाविष्ट करावे व त्यांचा तेवढाच सरकारी महामंडळामार्फत लिलाव करावा, अशी मागणी पाऊसकर यांनी केली.