शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

शैक्षणिक गोंधळाला दणक्यात प्रारंभ

By admin | Updated: June 14, 2016 02:56 IST

पणजी : राज्यात शाळा सुरु होऊन एक आठवडा उलटला असला तरी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत देण्यात येणारी

पणजी : राज्यात शाळा सुरु होऊन एक आठवडा उलटला असला तरी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत देण्यात येणारी पाठ्यपुस्तके अजूनही मिळालेली नाहीत. काही शाळांत केवळ एक ते दोन विषयांची पुस्तके देण्यात आली आहेत. तर काही विद्यालयांनी गेला आठवडाभर मधल्या सुट्टीतच वर्ग सोडले असल्याने शिकवणीला सुरुवातच केली नाही. पावसाळा सुरु झाला तरी सरकारी शाळांमधील मुलांना अजूनही गणवेश आणि रेनकोट मिळालेले नाहीत. पहिली व तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश आणि रेनकोट शिक्षण खाते देत असते. पावसाळा सुरु होताना तरी आमच्या मुलांना रेनकोट दिले जावेत अशी पालकांची दरवर्षी मागणी असते. मात्र, कुठच्याच वर्षी वेळेत रेनकोट व गणवेशही मिळत नाहीत. शिक्षण खात्याचे बहुतांश अधिकारी मे महिन्यात रजेवर जातात. या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी अधिकारी रजेवर असताना कामच करत नाहीत. अधिकारी जूनमध्ये रुजू होतात, यामुळेच गणवेश व रेनकोटना विलंब होतो. सोमवारपासून शाळेचा दुसरा आठवडा सुरु झाला असून विद्यालयांतील शिक्षकांनी आपल्या विषयासाठी आवश्यक असलेल्या वह्यांची सूची दिली. सुरुवातीचे दोन दिवस वगळता शाळा नेहमीच्या वेळेवर सोडण्यात आली. मधल्या वेळेत मुलांना अभ्यास देणे आवश्यक असल्याने स्पेलिंग, पाढे, बाराखडी गिरवणे असा अभ्यास देऊन विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवण्यात आले. शाळा सुरु झाली तेव्हापासूनच पावसाने सुरुवात केली असल्याने मुलांना पटांगणात खेळण्यासाठी सोडणेही शक्य होत नाही. पुस्तके न मिळल्याने अभ्यासालाही सुरुवात होत नसल्याने अजूनही वर्गात मजामस्ती करण्याच्या मूडमध्ये मुले शाळेला जात आहेत. शिक्षण खात्यातर्फे राज्यातील शाळा सुरु होण्यापूर्वीच सर्व तालुकास्तरीय भाग- शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पुस्तके पोहोचविण्यात येतील असे सांगितले गेले होते. मात्र, अजूनही बऱ्याचशा भागशिक्षणाधिकारी कार्यालयांत पुस्तके पोहोचली नसल्याने सूत्रांनी सांगितले. शाळा सुरु होण्यापूर्वी सर्व विद्यालयांत पुस्तके पोहोचविण्यात येतील, असे दरवर्षी शिक्षण खात्यातफे जाहीर करण्यात येते. मात्र, प्रत्येक वर्षी शाळांमध्ये आठवडा उलटला तरी पुस्तके दिली जात नाहीत. राजधानी पणजीतील काही शाळांमध्येही पुस्तके देण्यात आली नाहीत. पुस्तके नसल्याने अभ्यास घेता येत नाही आणि शाळेत विद्यार्थी दंगा करतात. यामुळे काही शिक्षक जुन्या वर्गातील विद्यार्थ्यांची पुस्तके मागवून घेऊन नव्याने प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांना देतात आणि अभ्यास सुरु करतात. मात्र, या प्रकारात सर्वच मुलांना पुस्तके मिळत नाहीत. जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरु होतात हे माहीत असूनही खात्यातर्फे पुस्तके पहिल्या आठवड्यापर्यंत शाळेत पाठविण्याची तजवीज केली जात नाही. (प्रतिनिधी)