शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

काही मंत्र्यांना डच्चू मिळणार; राज्यात नेतृत्व बदल नाही, मुख्यमंत्र्यांना मोदींचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2025 12:47 IST

प्रमोद सावंत 'टेन्शन फ्री'

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्य मंत्रिमंडळात नेतृत्वबदल होण्याची शक्यता आता संपुष्टात आलेली आहे. काहीजणांनी मध्यंतरी प्रयत्न करून पाहिला तरी, नेतृत्वबदल होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे राज्य कारभार चालवत आहेत. पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांना गोव्यातील विकासाबाबत पूर्ण पाठिंबा आहे. यापुढेही पाठिंब्याची ग्वाही पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना गुरुवारी दिल्ली भेटीवेळी दिली आहे. एक प्रकारे मुख्यमंत्र्यांना राजकीयदृष्ट्या केंद्र सरकारचे सुरक्षा कवच लाभले आहे.

मुख्यमंत्री काल सायंकाळी दिल्लीहून गोव्यात परतले. ते दिल्ली भेटीनंतर टेन्शन फ्री झाले आहेत. सरकारमध्ये नेतृत्व बदल होणार नाही, काही मंत्र्यांना तेवढा मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा लागेल याची कल्पना मुख्यमंत्र्यांना आली आहे. मुख्यमंत्री बुधवार व गुरुवार असे दोन दिवस दिल्लीत होते. त्यांनी अनेक केंद्रीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर गोव्यात मंत्रिमंडळ फेररचना होईल. मुख्यमंत्रिपदी प्रमोद सावंत हेच कायम राहतील. २०२७ ची विधानसभा निवडणूक तरी सावंत यांच्याच नेतृत्वाखाली लढविली जाईल, अशी माहिती मिळाली.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना राज्य सरकारने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच सदोदित केंद्राकडून लाभलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राज्याच्या विकासाला आणि प्रगतीला अधिक गती देण्यासाठी मोदी यांचे अमूल्य मार्गदर्शन व हातभार कायम लाभावा, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी केले स्मितहास्य!

केंद्रीय नेत्यांची भेट घेऊन काल सायंकाळी गोव्यात परतलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना मंत्रिमंडळ फेररचनेबद्दल पत्रकारांनी विचारले असता, काहीही उत्तर न देता त्यांनी केवळ 'स्मित हास्य' केले. दिल्ली दौऱ्याबद्दल माहिती देताना मात्र ते म्हणाले की, पंतप्रधान, गृहमंत्री आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी सरकारमधील काही कामांबाबत तसेच पक्षाशी संबंधित काही मुद्द्यांवर मी चर्चा केली. दाबोळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांसोबत प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हेही होते. सावंत म्हणाले की, जेव्हा पक्ष आणि सरकार एकाच मार्गावरुन जातो तेव्हा सर्व काही सुरळीत चालते. राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला, परंतु मंत्रिमंडळ फेरबदलाबाबतच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतNarendra Modiनरेंद्र मोदी