शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर पोलिसांना आश्रय

By admin | Updated: July 31, 2014 02:25 IST

पणजी : एका बाजूने चोरट्यांनी राज्यात धुमाकूळ घातला आहे आणि ज्या चोरट्यांना पकडण्यात आले त्या चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेले

पणजी : एका बाजूने चोरट्यांनी राज्यात धुमाकूळ घातला आहे आणि ज्या चोरट्यांना पकडण्यात आले त्या चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेले दागिने ताब्यात घेण्यासाठी पोलीस लोकांकडे लाच मागत आहेत आणि अशा पोलिसांची सरकार पाठराखण करीत असल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केला. प्रश्नोत्तराच्या तासाला अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी हा प्रश्न उपस्थित केला. मडगाव येथील सुनिता सुरेंद्र मळकर्णेकर यांच्या घरी मार्च २०१२ मध्ये दागिन्यांची चोरी झाली होती. नंतर चोरट्यांना पोलिसांनी पकडले होते; परंतु पकडण्यात आलेले दागिने ताब्यात देण्यासाठी पोलिसांनी तक्रारदार महिलेकडे पैसे मागितले होते व ते न दिल्यामुळे आजपर्यंत त्यांना दागिने परत केले नसल्याचा आरोप सरदेसाई यांनी सभागृहात केला. तसे नसल्यास या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी त्यांनी केली. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर समाधान न झाल्यामुळे पोलिसांची कृती बरोबर वाटत असल्यास या प्रकरणात उपनिरीक्षक डायगो ग्रासियस याला निलंबित का करण्यात आले होते, असा प्रश्न सरदेसाई यांनी केला. सभागृहात त्याच्यावर आरोप झाल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले होते; परंतु त्याची काहीही चूक नसल्याचे नंतर तपासातून आढळून आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मडगावचे निरीक्षक सुदेश नाईक यांना निलंबित करण्याची सदस्याची मागणी त्यांनी फेटाळली. निरीक्षक नाईक यांनी तक्रारदार महिलेची पैसे मागून सतावणूक चालविल्याची, तसेच हे संपूर्ण प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोप केला. (प्रतिनिधी)