शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

लाचखोर पोलिसांना आश्रय

By admin | Updated: July 31, 2014 02:25 IST

पणजी : एका बाजूने चोरट्यांनी राज्यात धुमाकूळ घातला आहे आणि ज्या चोरट्यांना पकडण्यात आले त्या चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेले

पणजी : एका बाजूने चोरट्यांनी राज्यात धुमाकूळ घातला आहे आणि ज्या चोरट्यांना पकडण्यात आले त्या चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेले दागिने ताब्यात घेण्यासाठी पोलीस लोकांकडे लाच मागत आहेत आणि अशा पोलिसांची सरकार पाठराखण करीत असल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केला. प्रश्नोत्तराच्या तासाला अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी हा प्रश्न उपस्थित केला. मडगाव येथील सुनिता सुरेंद्र मळकर्णेकर यांच्या घरी मार्च २०१२ मध्ये दागिन्यांची चोरी झाली होती. नंतर चोरट्यांना पोलिसांनी पकडले होते; परंतु पकडण्यात आलेले दागिने ताब्यात देण्यासाठी पोलिसांनी तक्रारदार महिलेकडे पैसे मागितले होते व ते न दिल्यामुळे आजपर्यंत त्यांना दागिने परत केले नसल्याचा आरोप सरदेसाई यांनी सभागृहात केला. तसे नसल्यास या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी त्यांनी केली. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर समाधान न झाल्यामुळे पोलिसांची कृती बरोबर वाटत असल्यास या प्रकरणात उपनिरीक्षक डायगो ग्रासियस याला निलंबित का करण्यात आले होते, असा प्रश्न सरदेसाई यांनी केला. सभागृहात त्याच्यावर आरोप झाल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले होते; परंतु त्याची काहीही चूक नसल्याचे नंतर तपासातून आढळून आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मडगावचे निरीक्षक सुदेश नाईक यांना निलंबित करण्याची सदस्याची मागणी त्यांनी फेटाळली. निरीक्षक नाईक यांनी तक्रारदार महिलेची पैसे मागून सतावणूक चालविल्याची, तसेच हे संपूर्ण प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोप केला. (प्रतिनिधी)