शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

सत्तरीत झाडांची कत्तल

By admin | Updated: June 4, 2014 01:36 IST

वाळपई : नव्या लागवडीच्या नावाखाली सत्तरीत वन खात्याकडून झाडांची कत्तल सुरू केली आहे.

वाळपई : नव्या लागवडीच्या नावाखाली सत्तरीत वन खात्याकडून झाडांची कत्तल सुरू केली आहे. वन खात्याने चालविलेल्या कृत्यामुळे वन्यजीवांवर संकट उभे राहाण्याची भीती असून, असा प्रकार करंजोळ, हिवरे, कुडशे व सध्या ठाणे डोंगुर्ली येथे सुरू आहे. ठाणे-डोंगुर्ली येथील सर्वे क्र. १५ मध्ये असगी क्षेत्रात सध्या ५० हेक्टर जमिनीत वनखात्यातर्फे झाडांची कत्तल सुरू आहे. मुख्य म्हणजे ज्या ठिकाणी कत्तल सुरू आहे, ते क्षेत्र म्हादई अभयारण्यात येते. त्यामुळे वन खात्याच्या प्रकाराबद्दल ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करीत आहेत. वन खाते काजू लागवडीच्या नावाखाली मोठमोठी झाडे तोडीत आहे. फणस त्यानंतर त्या जमिनीत उपयोगी नसलेली झाडे लावीत असून, त्याचा कोणालाही फायदा होताना दिसत नाही. ज्या ठिकाणी जंगलतोड सुरू आहे, त्या ठिकाणी सांबर, हरण, गवारेडा, माकडे या वन्यप्राण्यांचा वावर आहे. त्या वन्य प्राणी कुमयो या झाडापासून मिळणार्‍या फळाचा वापर अन्न म्हणून करीत असल्याने त्याचीच कत्तल सुरू आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या मोकळीकतेवरच घाला घालण्याचा हा प्रकार वाटू लागला आहे. कत्तल करण्यात आलेल्या झाडांमध्ये सागवान, किनळ व कुमयो प्रकारातील झाडांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे वनखात्याच्या या वागण्यामुळे कुंपणच शेत खाते, तर दाद कुणाकडे मागायची, असा सवाल उपस्थित होत आहे. सामान्य जनतेला म्हादई अभयारण्यात जातासुद्धा येत नाही. त्या ठिकाणी असलेले एक झाडसुद्धा तोडण्याची परवानगी नाही. मग वन खातेच झाडांची कत्तल करू लागले, तर झाडांचे रक्षण कुणी करायचे, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. ज्यांची झाडांची सुरक्षा करण्यासाठी नेमणूक केली आहे, त्यांनाच झाडे तोडण्याचे कंत्राट मिळाल्याचे वाटते. वन खात्याच्या या वृत्तीमुळे म्हादई अभयारण्याला धोका निर्माण झाला आहे. वन खाते सत्तरीत ठिकठिकाणी म्हादई अभयारण्यात मोठमोठ्या झाडांची कत्तल करीत आहे. पर्यावरण संरक्षणासाठी वन खात्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. (प्रतिनिधी)