शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गोव्यात अडकलेल्या दोन हजार विदेशी पर्यटकांना मायदेशी नेण्यासाठी येणार सात खास विमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 20:36 IST

वास्को: लॉकडाऊन मुळे गोव्यात अडकून राहीलेल्या दोन हजार विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी हालचाली चालू करण्यात आल्या आहेत. पुढच्या ...

वास्को: लॉकडाऊन मुळे गोव्यात अडकून राहीलेल्या दोन हजार विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी हालचाली चालू करण्यात आल्या आहेत. पुढच्या पाच दिवसात दाबोळी विमानतळावर विविध देशातून सात खास विमाने या पर्यटकांना नेण्यासाठी गोव्यात येणार आहेत. लॉकडाऊन मुळे गोव्यात अडकून राहीलेल्या ३९९ विदेशी पर्यटकांना यापूर्वी दाबोळी विमानतळावरून खास विमानाने त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आलेले आहे.

कोरोना विषाणूची पसरण रोखण्यासाठी संपूर्ण भारतात २१ दिवसासाठी लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. याचे पालन गोव्यात सुद्धा कडक रित्या करण्यात येत असून यामुळे दाबोळी विमानतळावर राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय विमानसेवा सद्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. याचा परिणाम गोव्यात असलेल्या विदेशी पर्यटकांवर पडलेला असून त्यांना सद्या मायदेशी जाणे कठीण झालेले आहे. सदर पर्यटकांना मायदेशी पाठवण्यासाठी विविध हालचाली चालू करण्यात आलेल्या असून लवकरच त्यांना त्यांच्या राष्ट्रात पाठवण्यात येणार असल्याचे दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी सांगितले.

लॉकडाऊन झाल्यानंतर गोव्यात अडकून राहीलेल्या ३९९ विदेशी पर्यटकांना अजून पर्यंत खास विमानाने त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले आहे. यात २४९ युनायटेड किंगडम, १२१ रशिया व २९ चेक प्रजासत्ताक चे नागरिक असल्याची माहीती गगन मलिक यांनी दिली. गोव्यात अजून आणखीन २००० विदेशी पर्यटक अडकून असल्याची माहीती मलिक यांनी देऊन येणाऱ्या चार ते पाच दिवसात त्यांना सुद्धा त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. गोव्यात अडकून राहीलेल्या या विदेशी पर्यटकात फ्रेंकफट (जर्मनी), फिनलँड, इस्त्राईल, रशिया व वॉरसॉ (पोलंड) या राष्ट्रातील नागरिकांचा समावेश असल्याची माहीती संचालक गगन मलिक यांनी दिली.

लॉकडाऊन मुळे अडकून राहीलेल्या विदेशी पर्यटकांना नेण्यासाठी चार ते पाच दिवसात दाबोळी विमानतळावर सात खास विमाने येणार असून ती त्यांना घेऊन त्यांच्या मायदेशी जाणार आहेत. या दोन हजार विदेशी पर्यटकांव्यतिरिक्त गोव्यात आणखीन विदेशी पर्यटक अडकून राहीलेले आहेत काय याची चौकशी चालू असून असे असल्यास त्यांना सुद्धा येथून नेण्यासाठी येणाºया काळात उचित पावले उचलण्यात येणार असल्याचा विश्वास गगन मलिक यांनी पुढे व्यक्त केला. या पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येत असताना कोरोना विषाणूची पसरण होऊ नये यासाठी विविध प्रकारची खबरदारी बाळगण्यात येत आहे. प्रवाशी विमानातून जाताना सामाजिक अंतर (सोशल डीस्टंन्सीग) व इतर विविध प्रकारची सुरक्षेच्या दृष्टीने दाबोळी विमानतळावर पावले उचलण्यात येत असल्याचे मलिक यांनी माहीतीत शेवटी सांगितले.