शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सुरक्षा रक्षक पुन्हा सरसावले

By admin | Updated: February 6, 2015 01:43 IST

पणजी : नोकरी देण्याचे आश्वासन देऊनही फसवणूक करणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ कंत्राटी सुरक्षा रक्षकांनी गुरुवारपासून पणजीतील

पणजी : नोकरी देण्याचे आश्वासन देऊनही फसवणूक करणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ कंत्राटी सुरक्षा रक्षकांनी गुरुवारपासून पणजीतील आझाद मैदानावर पुन्हा धरणे आंदोलन सुरू केले. गेले दोन दिवस सुरू असलेल्या वाटाघाटींना सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने सुरक्षा रक्षकांनी आता नव्या जोमाने आंदोलनाला सुरुवात केली आहे. सेवेत कायम होण्याच्या आशेने गेले दोन महिने सुरक्षा रक्षकांनी पगाराव्यतिरिक्त काम केले. मात्र, दोन महिन्यांनंतर सरकारने आपले रंग दाखविण्यास सुरू केले आणि पाच खात्यांतील साधारण २०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. याबाबत कंत्राटी मजूर सोसायटीचे अध्यक्ष सुभाष साळकर यांना जाब विचारला असता ते म्हणाले की, आम्ही कर्मचाऱ्यांना काढून टाकले नाही, तर केवळ बदली केली आहे. मात्र, याबाबतचे लेखी पत्र देण्यास ते तयार नाहीत. सुरक्षा रक्षक संघटनेने सरकारशी बैठकीची मागणी केली होती. मात्र, सरकार बैठकीला घाबरत असल्याचा आरोप सुरक्षा रक्षकांचा विषय हाताळणाऱ्या नेत्या स्वाती केरकर यांनी सांगितले. कंत्राटी मजूर सोसायटी व मनुष्यबळ विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारस्थानाची चौकशी व्हावी, अशी मागणी केरकर यांनी केली आहे. सरकारने जाहीर आश्वासन देऊन सुरक्षा रक्षकांना फसविले आहे. आता नव्याने कामावर समावून घेत असलेल्या सुरक्षा रक्षकांनाही फसविले जात आहे. नोकरीपत्राची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट धमक्या दिल्या जातात. ‘नोकरीची आवश्यकता असल्यास नोकरी करा, अन्यथा नोकरी सोडा,’ असे सांगितले जाते. सरकार सर्वसामान्यांस वेठीस धरून सत्ता उपभोगत असल्याचा आरोपही केरकर यांनी केला. दरम्यान, सुरक्षा रक्षकांना पगारही देण्यात आला नाही. याबाबत कंत्राटी मजूर सोसायटीने पाठविलेले पत्र सरकारने अडवून ठेवले व सुरक्षा रक्षकांचा दोन महिन्यांचा पगारही अडवून ठेवला असल्याचे केरकर यांनी स्पष्ट केले. अंतर्गत राजकारणामुळे जुन्या व नव्या कर्मचाऱ्यांची फसवणूक चालविली असल्याचे केरकर म्हणाल्या. आता आम्ही सरकारच्या आश्वासनांना भुलणार नसून लेखी पत्र मिळाल्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नसल्याचे केरकर यांनी स्पष्ट केले. सुरक्षा रक्षकांना पूर्वीच्याच जागी कामावर घ्यावे व तशा पद्धतीचे लेखी पत्र द्यावे, अशी मागणी लावून धरण्यात आली आहे. सध्या साधारण दीडशे सुरक्षा रक्षक दिवस-रात्र आंदोलनासाठी आझाद मैदानावर बसणार आहेत. यात बहुतांश महिलांचा समावेश आहे. सुरक्षा रक्षकांना आंदोलनामुळे कोणत्याही बऱ्या-वाईट समस्येला सामोरे जावे लागल्यास त्याची सर्व जबाबदारी पार्सेकर सरकारवर असेल, असे केरकर यांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)