शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा रक्षक पुन्हा सरसावले

By admin | Updated: February 6, 2015 01:43 IST

पणजी : नोकरी देण्याचे आश्वासन देऊनही फसवणूक करणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ कंत्राटी सुरक्षा रक्षकांनी गुरुवारपासून पणजीतील

पणजी : नोकरी देण्याचे आश्वासन देऊनही फसवणूक करणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ कंत्राटी सुरक्षा रक्षकांनी गुरुवारपासून पणजीतील आझाद मैदानावर पुन्हा धरणे आंदोलन सुरू केले. गेले दोन दिवस सुरू असलेल्या वाटाघाटींना सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने सुरक्षा रक्षकांनी आता नव्या जोमाने आंदोलनाला सुरुवात केली आहे. सेवेत कायम होण्याच्या आशेने गेले दोन महिने सुरक्षा रक्षकांनी पगाराव्यतिरिक्त काम केले. मात्र, दोन महिन्यांनंतर सरकारने आपले रंग दाखविण्यास सुरू केले आणि पाच खात्यांतील साधारण २०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. याबाबत कंत्राटी मजूर सोसायटीचे अध्यक्ष सुभाष साळकर यांना जाब विचारला असता ते म्हणाले की, आम्ही कर्मचाऱ्यांना काढून टाकले नाही, तर केवळ बदली केली आहे. मात्र, याबाबतचे लेखी पत्र देण्यास ते तयार नाहीत. सुरक्षा रक्षक संघटनेने सरकारशी बैठकीची मागणी केली होती. मात्र, सरकार बैठकीला घाबरत असल्याचा आरोप सुरक्षा रक्षकांचा विषय हाताळणाऱ्या नेत्या स्वाती केरकर यांनी सांगितले. कंत्राटी मजूर सोसायटी व मनुष्यबळ विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारस्थानाची चौकशी व्हावी, अशी मागणी केरकर यांनी केली आहे. सरकारने जाहीर आश्वासन देऊन सुरक्षा रक्षकांना फसविले आहे. आता नव्याने कामावर समावून घेत असलेल्या सुरक्षा रक्षकांनाही फसविले जात आहे. नोकरीपत्राची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट धमक्या दिल्या जातात. ‘नोकरीची आवश्यकता असल्यास नोकरी करा, अन्यथा नोकरी सोडा,’ असे सांगितले जाते. सरकार सर्वसामान्यांस वेठीस धरून सत्ता उपभोगत असल्याचा आरोपही केरकर यांनी केला. दरम्यान, सुरक्षा रक्षकांना पगारही देण्यात आला नाही. याबाबत कंत्राटी मजूर सोसायटीने पाठविलेले पत्र सरकारने अडवून ठेवले व सुरक्षा रक्षकांचा दोन महिन्यांचा पगारही अडवून ठेवला असल्याचे केरकर यांनी स्पष्ट केले. अंतर्गत राजकारणामुळे जुन्या व नव्या कर्मचाऱ्यांची फसवणूक चालविली असल्याचे केरकर म्हणाल्या. आता आम्ही सरकारच्या आश्वासनांना भुलणार नसून लेखी पत्र मिळाल्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नसल्याचे केरकर यांनी स्पष्ट केले. सुरक्षा रक्षकांना पूर्वीच्याच जागी कामावर घ्यावे व तशा पद्धतीचे लेखी पत्र द्यावे, अशी मागणी लावून धरण्यात आली आहे. सध्या साधारण दीडशे सुरक्षा रक्षक दिवस-रात्र आंदोलनासाठी आझाद मैदानावर बसणार आहेत. यात बहुतांश महिलांचा समावेश आहे. सुरक्षा रक्षकांना आंदोलनामुळे कोणत्याही बऱ्या-वाईट समस्येला सामोरे जावे लागल्यास त्याची सर्व जबाबदारी पार्सेकर सरकारवर असेल, असे केरकर यांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)