शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

सुरक्षित या, सुरक्षित रहा, सुरक्षित चला, पोलिसांचा पर्यटकांना संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 19:13 IST

सरळमार्गे या किंवा आड मार्गे या येताना कायद्याचे उल्लंघन करून येण्यापेक्षा त्याचे पालन करून या.

म्हापसा : सरळमार्गे या किंवा आड मार्गे या येताना कायद्याचे उल्लंघन करून येण्यापेक्षा त्याचे पालन करून या. सहकार्य करून गोव्यात वास्तव्य करा. गोवा तुमचा आहे. त्यामुळे सुरक्षेवर भर देण्यास सहकार्य करून निवांत वास्तव्य करा व आनंदाने माघारी चला असा जणू संदेश गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी दिला आहे. पुढील किमान आठ दिवस तरी कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी जागोजागी नाक्यावर आड वाटेवर राहून सुरक्षेवर भर दिलेल्या पोलिसांनी त्यातून संदेश देत आहेत.नाताळापासून ते नवीन वर्षापर्यंत गोव्यात पर्यटकांची रिघ लागलेली असते. या दिवसात येणारा पर्यटक किना-यावर जाण्यास प्राधान्य देत असतो. खास करून उत्तर गोव्यातील कांदोळीपासून ते बागापर्यंत तसेच मोरजीपासून ते हरमलपर्यंतच्या किना-यावर जाण्यास तो भर देत असतो. फिरणे सोयीस्कर ठरावे यासाठी स्वत:ची वाहने घेऊन हे पर्यटक दाखल होत असतात. त्यामुळे या काळात गोव्यातील वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण तणाव पडलेला असतो. वाढलेल्या या तणावाच्या काळात पर्यटकांसोबत स्थानिकांना कोणत्याच प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. किनारी भागात तर त्यांचा जास्त प्रमाणावर वापर केला जात आहे.गोव्यात दाखल होत असलेले तसेच नव्याने आलेले पर्यटक रस्ता माहीत नसल्याने सरळ मार्गी किंवा प्रमुख रस्त्याचा वापर करीत असतात; पण अनेक वेळा येऊन गेलेले पर्यटक वाहनांच्या होणा-या गर्दीतून वाट काढणे सोयीस्कर ठरावे किंवा कायद्यापासून पोलिसांच्या जाचापासून सुटका करून घेण्यासाठी आड मार्गाचा कमीत कमी वाहतूक असलेल्या मार्गाचा वापर करतात. आड मार्गाने जाताना गैरप्रकार करण्यावर भर देत असतात. हे प्रकार थांबावे नियंत्रणात राहावे यासाठी पोलिसांकडून सरळ मार्गाबरोबर आड मार्गावरही देखरेख ठेवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यात प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाते. तपासणी करताना त्यातून येणा-या पर्यटकांना त्याचा त्रास होणार नाही किंवा रस्त्यावरील इतर वाहन चालकांची अडवणूक होणार नाही याची दक्षता बाळगली जात आहे.कळंगुट पोलीस स्थानकाचे निरीक्षक जिवबा दळवी यांनी या संबंधी दिलेल्या माहितीनुसार वाहतुकीत सुसूत्रता रहावी दुस-यांना अडथळे निर्माण होऊ नये तसेच इतरांना त्रास होऊ नये यासाठी ही उपाय योजना करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यातून कोणालाही कसल्याच प्रकारचा त्रास केला जात नसल्याचे ते म्हणाले. पोलीस हे लोकांच्या सहकार्यासाठी त्यांच्या मदतीसाठी असल्याने प्रत्येकाने या दिवसात त्यांना मदत करावी, असे मत म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी व्यक्त केले.