शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
3
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
4
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
5
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
6
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
7
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
8
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
9
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
10
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
11
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
12
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
13
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
14
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
15
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
16
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
17
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
19
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
20
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

प्रवेशासाठी विद्यालयांत गर्दी

By admin | Updated: May 1, 2016 02:27 IST

पणजी : या आठवड्यात शैक्षणिक निकाल जाहीर झाले आणि मुलांच्या पुढच्या वर्गाच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी पुन्हा

पणजी : या आठवड्यात शैक्षणिक निकाल जाहीर झाले आणि मुलांच्या पुढच्या वर्गाच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी पुन्हा पालकांची धावपळ सुरू झाली. राज्यात इयत्ता अकरावीचा निकाल आठ दिवसांपूर्वीच जाहीर झाला आणि बारावीसाठी नव्याने अ‍ॅडमिशन घेण्यासाठी विविध उच्च माध्यमिक विद्यालयांत पालक आणि मुलांच्या रांगा दिसू लागल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत म्हणजे २९ आणि ३0 एप्रिल रोजी प्राथमिक आणि माध्यमिक स्तरांवरील विद्यार्थ्यांचे निकालही जाहीर झाले आहेत. त्यामुळे मुलांची शाळा बदलणे, दुसऱ्या शहरात, राज्यांत जाण्यासाठी मुलांची नावे काढणे, दुसऱ्या शाळेत नोंदणी करणे या कामात पालक व्यस्त दिसत आहेत. पणजी येथील मुष्टिफंड हायस्कूलमध्येही शनिवारी सकाळीच १२ वीसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी-पालकांची गर्दी दिसत होती. विविध शाळांमध्ये नावनोंदणी झालेल्या मुलांचे पालक गणवेश पद्धती, अर्जाचे सोपस्कार, नावनोंदणीची प्रक्रिया करण्यात व्यस्त दिसत आहेत. राज्यात शैक्षणिक वर्ष सुरू व्हायला वेळ असला तरी नावनोंदणीची प्रक्रिया, गणवेश इत्यादीचे काम सुरू झाले आहे. येत्या काही दिवसांत दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर नावनोंदणीला अधिक गती येईल. ६ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)