शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

ग्रामस्थ तुरुंगात; सोनशीत शुकशुकाट

By admin | Updated: April 15, 2017 02:07 IST

दशरथ मांद्रेकर ल्ल वाळपई३० कुटुंबांचा छोटासा सोनशी गाव सध्या ओस पडला आहे. मंगळवारपासून गावात शब्दश: स्मशानशांतता पसरली आहे. खनिज वाहतूक

दशरथ मांद्रेकर ल्ल वाळपई३० कुटुंबांचा छोटासा सोनशी गाव सध्या ओस पडला आहे. मंगळवारपासून गावात शब्दश: स्मशानशांतता पसरली आहे. खनिज वाहतूक रोखल्यामुळे गावातील ४५ जणांना कोलवाळ तुरुंगात डांबल्यामुळे गावातील सर्वच घरांना कुलपे लावलेली दिसून येतात. पालक तुरुंगात अडकल्याने मुलांचे हाल होत आहेत.लोकशाही व्यवस्था किती महागात पडते, याचे उदाहरण सोनशी गावात पाहावयास मिळते. सध्या गावात शांतता, तर रस्त्यावरून खनिज ट्रकांची उन्मत्त वर्दळ, अशी विरोधाभासाची स्थिती दिसते. गावातून सेसा गोवा, केणी, डीएमसी, फोमेन्तो, आयएलपीएलसारख्या बड्या खाण कंपन्यांची वाहतूक सुरू आहे. खाण कंपन्या सुरू झाल्यापासून गावाला समस्या पोखरू लागल्या. धूळ प्रदूषण, पाणीटंचाईने डोके वर काढले. नागरिकांनी सरकार दरबारी तसेच खाण कंपन्यांकडे गाऱ्हाणी मांडली; पण न्याय मिळाला नाही. कंटाळलेल्या नागरिकांनी लोकशाही पद्धतीनेच रास्ता रोको केला. प्रथम प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देऊन आंदोलन बंद करण्यास सांगण्यात आले; पण बैठकीत तोडगा न निघाल्याने नागरिकांनी परत रस्ता रोको केला. त्या वेळी त्यांना अटक करून सोडून देण्यात आले; पण तोडगा काढण्यात आला नाही. उलट कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात खनिज वाहतूक सुरू केली. त्या विरोधात नागरिकांनी पुन्हा रस्ता रोको केला आणि पोलिसांनी ४५ जणांना अटक करून न्यायालयीन कोठडी दिली. या आंदोलकांची मुले सध्या हलाखीत जगत आहेत. सर्वच घरे बंद असून मुले आई-वडिलांच्या वाटेवर डोळे लावून आहेत.धुळीने माखला गावसोनशी गावाजवळून जाणाऱ्या रस्त्यावर ११८४ ट्रक सुरू आहेत. त्यामुळे दर पाच सेकंदाला ट्रक येत असून पाच मिनिटांनी ट्रक सोडण्याचे खाण कंपन्यांनी दिलेले आश्वासन धाब्यावर बसविल्याचे दिसते. गावात धूळ प्रदूषण झाले आहे.पावसाळ्यात मातीवाहून येण्याची शक्यताखाण कंपनीने साठविलेली माती पावसाळ्यात गावात वाहून येण्याची शक्यता आहे. गावाजवळच मातीचे मोठमोठे ढिगारे असून पावसाळ्यात त्या ढिगाऱ्यांची माती गावात आल्यास गाव मातीखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. शाळेलाही धोका आहे.सरकारची खाण कंपन्यांना साथसरकारने प्रथमपासून खाण कंपन्यांची साथ दिली आहे. ग्रामस्थांनी आंदोेलन सुरू केल्यापासून नागरिकांचे कोणतेही प्रश्न सोडविले नसून पोलिसांनीसुद्धा खाण कंपन्यांचे समर्थन करताना नागरिकांना तुरुंगात डांबले आहे, असा आरोप नागरिक करत आहेत. सध्याची स्थिती सोडविण्यासाठी सरकारने नागरिकांना साथ देण्याची गरज होती; पण स्थिती विपरित आहे.अतिरिक्त वाहतूक बंदचा आदेशडिचोली उपजिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन शनिवारपासून अतिरिक्त खनिज वाहतूक बंद करण्याचा आदेश दिला. ११८४ ट्रकव्यतिरिक्त आणखी ट्रक वाहतुकीला न घेण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार उपजिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला. खाण कंपन्या आणखी ४00 अतिरिक्त ट्रक घेणार होत्या.(प्रतिनिधी)