शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

ग्रामस्थ तुरुंगात; सोनशीत शुकशुकाट

By admin | Updated: April 15, 2017 02:07 IST

दशरथ मांद्रेकर ल्ल वाळपई३० कुटुंबांचा छोटासा सोनशी गाव सध्या ओस पडला आहे. मंगळवारपासून गावात शब्दश: स्मशानशांतता पसरली आहे. खनिज वाहतूक

दशरथ मांद्रेकर ल्ल वाळपई३० कुटुंबांचा छोटासा सोनशी गाव सध्या ओस पडला आहे. मंगळवारपासून गावात शब्दश: स्मशानशांतता पसरली आहे. खनिज वाहतूक रोखल्यामुळे गावातील ४५ जणांना कोलवाळ तुरुंगात डांबल्यामुळे गावातील सर्वच घरांना कुलपे लावलेली दिसून येतात. पालक तुरुंगात अडकल्याने मुलांचे हाल होत आहेत.लोकशाही व्यवस्था किती महागात पडते, याचे उदाहरण सोनशी गावात पाहावयास मिळते. सध्या गावात शांतता, तर रस्त्यावरून खनिज ट्रकांची उन्मत्त वर्दळ, अशी विरोधाभासाची स्थिती दिसते. गावातून सेसा गोवा, केणी, डीएमसी, फोमेन्तो, आयएलपीएलसारख्या बड्या खाण कंपन्यांची वाहतूक सुरू आहे. खाण कंपन्या सुरू झाल्यापासून गावाला समस्या पोखरू लागल्या. धूळ प्रदूषण, पाणीटंचाईने डोके वर काढले. नागरिकांनी सरकार दरबारी तसेच खाण कंपन्यांकडे गाऱ्हाणी मांडली; पण न्याय मिळाला नाही. कंटाळलेल्या नागरिकांनी लोकशाही पद्धतीनेच रास्ता रोको केला. प्रथम प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देऊन आंदोलन बंद करण्यास सांगण्यात आले; पण बैठकीत तोडगा न निघाल्याने नागरिकांनी परत रस्ता रोको केला. त्या वेळी त्यांना अटक करून सोडून देण्यात आले; पण तोडगा काढण्यात आला नाही. उलट कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात खनिज वाहतूक सुरू केली. त्या विरोधात नागरिकांनी पुन्हा रस्ता रोको केला आणि पोलिसांनी ४५ जणांना अटक करून न्यायालयीन कोठडी दिली. या आंदोलकांची मुले सध्या हलाखीत जगत आहेत. सर्वच घरे बंद असून मुले आई-वडिलांच्या वाटेवर डोळे लावून आहेत.धुळीने माखला गावसोनशी गावाजवळून जाणाऱ्या रस्त्यावर ११८४ ट्रक सुरू आहेत. त्यामुळे दर पाच सेकंदाला ट्रक येत असून पाच मिनिटांनी ट्रक सोडण्याचे खाण कंपन्यांनी दिलेले आश्वासन धाब्यावर बसविल्याचे दिसते. गावात धूळ प्रदूषण झाले आहे.पावसाळ्यात मातीवाहून येण्याची शक्यताखाण कंपनीने साठविलेली माती पावसाळ्यात गावात वाहून येण्याची शक्यता आहे. गावाजवळच मातीचे मोठमोठे ढिगारे असून पावसाळ्यात त्या ढिगाऱ्यांची माती गावात आल्यास गाव मातीखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. शाळेलाही धोका आहे.सरकारची खाण कंपन्यांना साथसरकारने प्रथमपासून खाण कंपन्यांची साथ दिली आहे. ग्रामस्थांनी आंदोेलन सुरू केल्यापासून नागरिकांचे कोणतेही प्रश्न सोडविले नसून पोलिसांनीसुद्धा खाण कंपन्यांचे समर्थन करताना नागरिकांना तुरुंगात डांबले आहे, असा आरोप नागरिक करत आहेत. सध्याची स्थिती सोडविण्यासाठी सरकारने नागरिकांना साथ देण्याची गरज होती; पण स्थिती विपरित आहे.अतिरिक्त वाहतूक बंदचा आदेशडिचोली उपजिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन शनिवारपासून अतिरिक्त खनिज वाहतूक बंद करण्याचा आदेश दिला. ११८४ ट्रकव्यतिरिक्त आणखी ट्रक वाहतुकीला न घेण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार उपजिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला. खाण कंपन्या आणखी ४00 अतिरिक्त ट्रक घेणार होत्या.(प्रतिनिधी)