शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

खाण धंद्याची ‘रुडरलेस’ भलावण

By admin | Updated: March 31, 2015 02:06 IST

पणजी : निवृत्त आयएएस अधिकारी अरविंद भाटीकर यांनी लिहिलेल्या ‘रुडरलेस डेमोक्रेसी’ (भरकटलेली लोकशाही) या खाण धंद्याची भलावण

पणजी : निवृत्त आयएएस अधिकारी अरविंद भाटीकर यांनी लिहिलेल्या ‘रुडरलेस डेमोक्रेसी’ (भरकटलेली लोकशाही) या खाण धंद्याची भलावण करणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ््याला मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेल्या खाण व्यावसायिकांच्या उपस्थितीत सोमवारी भाजप सरकारसह न्या. एम. बी. शहा यांची मुक्तकंठे निर्भर्त्सना करण्यात आली. खाण धंद्याला बंदीचे दिवस पाहायला लावणाऱ्या लोकशाहीच्या चारही खांब्यांवर पुस्तकात टीका करण्यात आली असल्याचे लेखकानेच या वेळी जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती राहिलेल्या न्या. शहा यांच्यासारख्या माणसाकडून कोणतीही भीडभाड न ठेवणारा अहवाल अपेक्षित नाही, असे सोहळ्याला मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव द. म. सुखटणकर यांनी म्हटले आणि सांगितले की, खाणचालकांना त्यांची बाजू मांडू देणे हा मोठाच गलथानपणा आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने आपल्या या माजी सहकाऱ्यांचा अहवाल संपूर्णार्थी न स्वीकारता त्याचा पुढे अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरिय समिती नेमणे, यातच त्या अहवालाबद्दलची अविश्वसनियता आहे, असे ते पुढे म्हणाले.अहवाल प्रसिद्ध झाल्यावर राष्ट्रीय प्रसारमाध्यमांसह इतर घटकांना त्यातील सनसनाटीपणा अधिक भावला व खाण उद्योगावर ते तुटून पडले, असाही पुस्तकातील नोंदीतील उल्लेख त्यांनी केला; परंतु ते पुढे असेही म्हणाले, प्रत्येक उद्योग पर्यावरणावर काही ना काही परिणाम करतोच, तरीही विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखण्यासाठी निश्चित निकष ठरविले गेले पाहिजेत. केंद्र सरकारने कर्नाटकातील खाण उद्योगावर राजकीय कारणांसाठी कारवाई करण्याचा निर्णय घेतला; परंतु ओडिशा व इतर राज्यांतील खाण व्यवसायाची चौकशी करताना त्यांना गोव्यालाही गोवण्याची आवश्यकता नव्हती.गोव्याचे माजी मुख्य सचिव जे. सी. आल्मेदा यांनी आपल्या भाषणात गोव्यातील खनिज निर्यातदार जबाबदारपणे व्यवहार करीत असता राज्याबाहेरील व्यापारी व मंत्री यांनी त्यात लुडबूड करून या व्यवसायाचे वाटोळे केले, असे मत मांडले. त्यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा उल्लेख करून कबुली दिली की, आपण कायद्यात तरतूद असल्यानुसार लोह खनिजाच्या उत्खननावर रॉयल्टी लागू करण्याची शिफारस केली असता बांदोडकरांनी ती आपल्याला निर्यातीवर लागू करण्याची सूचना केली व ती आपण स्वीकारली होती. बंदरात येणाऱ्या जहाजांना डेमरेज भरावा लागू नये म्हणून कंपन्यांना ज्यादा उत्पादन घेण्याची आवश्यकता असते, असे त्यावेळी बांदोडकरांनी आपल्याला समजावले, अशी कबुली आल्मेदा यांनी जाहीरपणे दिली.राज्यात खाणींनी पर्यावरणाचा प्रश्न निर्माण केला आहे, असे सांगून सरकारने तथाकथित खाण अवलंबितांना दिलेल्या खैरातींवर त्यांनी कडक टीका केली. हा पैसा कोणाचा आहे आणि अशाप्रकारे उधळण्याचा सरकारचा अधिकार काय, असे आल्मेदा म्हणाले.लेखक भाटीकर यांनी आपल्या प्रास्ताविकात ज्या पद्धतीने शहा यांनी हा अहवाल तयार केला आणि त्यात शब्दांची मांडणी केली आहे ते आक्षेपार्ह असून सर्वोच्च न्यायालयाचा एक निवृत्त न्यायाधीश असे एकांगी वर्तन कसे करू शकतो, याचे आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचे मत मांडले. शहा आयोगाने राज्याच्या अर्थव्यवस्थेचा सांगोपांग विचार केलेला नाही.शहा अहवाल लोकसभेत ठेवल्याच्या तीन दिवसांत गोव्यात पर्रीकर सरकारने खाणी ‘बंद’ करण्याचा घेतलेला ‘सुपरसॉनिक’ निर्णय हा घिसाडघाईचा, असे वर्णन भाटीकर यांनी केले.युगवेद प्रकाशनाच्या या सोहळ््याला श्रीनिवास धेंपे, शिवानंद साळगावकर, अंजू तिंबले, अंबर तिंबले, आमदार गणेश गावकर,उदय भेंब्रे, दत्ता नायक, दामोदर मावजो, एदुआर्द फालेरो आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)