शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

ज्येष्ठांची धावाधाव

By admin | Updated: April 22, 2015 01:43 IST

पणजी : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ सुरूच राहावा म्हणून आपण जिवंत असल्याचा दाखला सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सादर करणे

पणजी : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ सुरूच राहावा म्हणून आपण जिवंत असल्याचा दाखला सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सादर करणे सरकारने बंधनकारक केले आहे. तथापि, त्यासाठीची व्यवस्थाच नीट नसल्याने प्रचंड गोंधळ उडाला असून दाखले सादर करण्यासाठी झुंबड उडू लागली आहे. रोज शेकडो दाखल्यांवर सह्या करून विविध पक्षांचे आमदारही वैतागले आहेत.दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थींची एकूण संख्या सव्वालाखापेक्षा जास्त आहे. अगोदरच अलीकडे लाभार्थींना वेळेवर पैसे मिळत नाहीत. तीन-चार महिन्यांनी एकदा त्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. योजनेचे लाभार्थी हे विविध वयोगटांतील ज्येष्ठ नागरिक आहेत. ७0 ते ८५ वयोगटातील हजारो लाभार्थी आहेत. आता या योजनेचा लाभ सुरू राहावा म्हणून हयातीचा दाखला सादर करण्यासाठी या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अगोदर समाजकल्याण खात्याकडे जाऊन मंजुरी क्रमांक मिळवावा लागतो. मग दाखल्यासाठी आमदाराची सही घ्यावी लागते. समाजकल्याण खात्यात व विविध आमदारांकडे ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागत आहेत. अनेक नागरिक आजारी आहेत. त्यांना घराबाहेर पडणेही शक्य होत नाही. पर्वरीचे आमदार रोहन खंवटे तसेच फोंड्याचे आमदार लवू मामलेदार यांनीही या व्यवस्थेत सरकारने सुधारणा करून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली.(खास प्रतिनिधी)