शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

आरजीच्या पदयात्रेला चाप; सत्तरी तालुक्यात १४४ कलम लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 15:13 IST

सत्तरीत १४४ कलम लागू केले आहे. त्यामुळे आरजीच्या पदयात्रेला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, वाळपई : सत्तरीत आरजीच्या पदयात्रेला परवानगी नाकारली असून, तसा आदेश सत्तरी तालुका उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांनी दिला आहे. त्याचबरोबर सत्तरीत १४४ कलम लागू केले आहे. त्यामुळे आरजीच्या पदयात्रेला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

सोमवार (दि. २०) पासून आरजीची पदयात्रा सुरू झाली होती. ती ठाणे डोंगुर्ली येथे पोलिसांनी रोखली. त्यानंतर पदयात्रा सुरू झाली; पण कोपार्डे येथे पुन्हा रोखली गेली. त्यानंतर त्याचा निर्णय सत्तरी उपजिल्हाधिकारी परब यांच्याकडे होता. मंगळवारी सत्तरीतील सरपंचांनी वाळपई उपजिल्हाधिकारी परब यांना निवेदन सादर करत, सत्तरीत आरजीच्या पदयात्रेला परवानगी न देण्याची मागणी केली होती.

पंचायतींकडून आक्षेप

नगरगाव : रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीच्या ठाणे सत्तरी येथून सुरु झालेल्या म्हादई संदर्भातील जागृती पदयात्रेस उपजिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली आहे. काल नाट्यमय घडामोडींमध्ये सत्तरी तालुक्यातील सर्व पंचायत सदस्य आणि वाळपई नगरपालिकेने या पदयात्रेला विरोध दर्शविला होता. तसेच आक्षेप नोंदविणारी निवेदने दिली होती. त्यामुळे जर पदयात्रा चालू राहिली असती, तर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून उपजिल्हाधिकारी यांनी सादर केलेला परवानगी अर्ज नाकारून उपजिल्हाधिकाऱ्यांनी पदयात्रा काढण्यास मज्जाव केला आहे.

या संदर्भात माहिती देताना नगरगाव सरपंच संध्या खाडिलकर यांना सांगितले की, म्हादई संदर्भातील पदयात्रा सत्तरी येथून निघाली होती. त्याच्यामुळे येथील लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन वादावादी झाली असती. संपूर्ण सत्तरी तालुका हा शांततामय तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. आमची ही शांतता भंग करायची नाही. म्हादई संदर्भात सत्तरीची जनता पूर्णपणे जागरूक आहे. म्हादई संदर्भातील प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. सरकारची न्यायालयीन लढाई लढतच आहे. अशा पदयात्रा काढून त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणूनच सर्व पंचायतींनी या पदयात्रेच्या विरोधात उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा