शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

विस्थापितांचे पुनर्वसन करा

By admin | Updated: April 20, 2015 01:35 IST

वास्को : बायणा समुद्रकिनाऱ्याचा विकास किंवा राष्ट्रीय महामार्गाला आमचा विरोध नसून विकासासाठीच विस्थापित होणाऱ्या रहिवाशांचे

वास्को : बायणा समुद्रकिनाऱ्याचा विकास किंवा राष्ट्रीय महामार्गाला आमचा विरोध नसून विकासासाठीच विस्थापित होणाऱ्या रहिवाशांचे सरकारने पुनर्वसन करावे, अशी मागणी बायणा येथील विस्थापित होणाऱ्या रहिवाशांनी पत्रकार परिषदेत केली.काटेबायणा येथील मच्छीमार समाजाच्या नेत्या कारिदाद परेरा यांच्या नेतृत्वाखाली ही पत्रपरिषद घेण्यात आली. या वेळी प्रकाश राठोड, नझिमा खान आदी उपस्थित होते. या वेळी कारिदाद परेरा यांनी आम्ही या ठिकाणी पोर्तुगीज काळापासून मच्छीमारी व्यवसाय करीत असून येथील काही रहिवासी पन्नास वर्षांपासून स्थायिक झालेले आहेत. यातील काही लोकांचे जन्मही येथेच झाले असल्याने ते जाती-धर्माने जरी परप्रांतीय असले तरी कायद्याने गोव्याचे नागरिकच आहेत. त्यांची घरे जरी बेकायदेशीर असली तरी सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. सरकारने आपली विकासकामे करताना कुणाच्याही पोटावर येऊ नये किंवा त्यांना बेघर करू नये, असे त्यांनी सांगितले. वर्षभर न्यायालयीन पाठपुरावा का केला नाही, असे विचारले असता न्यायालयीन लढा देण्यासाठी निवडलेल्या वकिलांनीच विश्वासघात केला, असे त्यांनी सांगितले. गेल्या निवडणुकीत आमदार मिलिंद नाईक यांनी घरे कायदेशीर करून देण्याचे आश्वासन दिले होते आणि आता त्यांनी यू-टर्न घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)