शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

प्रादेशिक आराखड्याची प्रक्रिया आॅक्टोबरनंतर!

By admin | Updated: August 8, 2014 02:25 IST

पणजी : राज्याच्या नव्या प्रादेशिक आराखड्याची प्रक्रिया आॅक्टोबरमध्ये सुरू करण्यात येईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले.

पणजी : राज्याच्या नव्या प्रादेशिक आराखड्याची प्रक्रिया आॅक्टोबरमध्ये सुरू करण्यात येईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले. आपल्या क्षेत्रात पाच वर्षांत किती इमारती उभ्या झालेल्या हव्या आहेत, हे ठरविण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना असेल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. प्रश्नोत्तराच्या तासावेळी काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी याबाबतचा प्रश्न मांडला होता. नवा प्रादेशिक आराखडा अजून आलेला नाही. याचा त्रास लोकांना होत आहे, असे रेजिनाल्ड म्हणाले. ज्यांना जमिनींचे रूपांतर करून घ्यायचे आहे, त्यांनाच नव्या आराखड्याची चिंता लागून राहिली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर, आपल्याला आपल्या कुठच्याही जमिनीचे रूपांतर करून झालेले नको आहे, असे उत्तर रेजिनाल्ड यांनी दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, आॅक्टोबरमध्ये गोव्यातील खनिज व्यवसायाचा प्रश्न मार्गी लागेल. त्यानंतर लगेच मी प्रादेशिक आराखड्यासाठीची प्रक्रिया सुरू करणार आहे. विविध घटकांशी आम्ही चर्चा करू. नगर नियोजन खात्याचे अधिकारी व तज्ज्ञ मिळून आराखडा तयार करतील. आम्ही प्रादेशिक आराखड्यात कुठेही सेटलमेंट झोन दाखवला, तरी आपल्या क्षेत्रात पाच वर्षांत किती बांधकामे उभी राहिलेली हवी आहेत हे पंचायतींनी ठरवावे, ग्रामसभांनी नव्हे. ग्रामसभांना सगळे लोक येत नाहीत. पंचायतींनी मतदान घेऊन इमारतींची संख्या ठरवावी. लोकांनी मला पाच वर्षांसाठी निवडून दिले असून मी विधानसभा निवडणुकीवेळी दिलेली सगळी आश्वासने पाच वर्षांत पूर्ण करीन, असेही मुख्यमंत्री म्हणाले. खाणप्रश्न मार्गी लागेपर्यंत सरकारला थांबण्याची गरज नाही, असा मुद्दा आमदार रेजिनाल्ड यांनी मांडला. (खास प्रतिनिधी)