शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

खाणमालकांकडून लूट वसूल करा!

By admin | Updated: May 13, 2014 18:28 IST

पणजी : राज्यातील बेकायदा खाणप्रश्नी लढणार्‍या कार्यकर्त्यांची बाजू खरी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निवाड्यातून स्पष्ट झाले आहे.

पणजी : राज्यातील बेकायदा खाणप्रश्नी लढणार्‍या कार्यकर्त्यांची बाजू खरी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निवाड्यातून स्पष्ट झाले आहे. अशा कार्यकर्त्यांविरुद्ध गुदरण्यात आलेले खटले सरकारने मागे घ्यावे, खाण व्यावसायिकांकडून ३० हजार कोटींची लूट वसूल करावी आणि बेकायदा खाणींची शिकार झालेल्या लोकांची सरकारने माफी मागावी, अशी मागणी चर्च संस्थेने केली आहे. चर्च संस्थेची शाखा असलेल्या ‘काउन्सिल फॉर सोशल जस्टिस अ‍ॅण्ड पीस’चे कार्यकारी सचिव फादर सावियो फर्नांडिस यांच्या सहीने चार पानी पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. ते पत्र चर्च संस्थेने सोमवारी सायंकाळी जाहीर केले. दि. २२ नोव्हेंबर २००७ पासून झालेला सगळा खाण व्यवसाय बेकायदा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यातून स्पष्ट झाले आहे. गोवा सरकारने खाण व्यवसाय निलंबित करणारा आदेश जारी करण्यापूर्वी २००७ पासूनचा हा बेकायदा खाण व्यवसाय लक्षात घ्यायला हवा होता. हे मोठे प्रशासकीय अपयश आहे, असे पत्रात म्हटले आहे. खाण महाघोटाळा ज्यांनी केला, त्या सर्वांविरुद्ध सरकारने कायदेशीर कारवाई सुरू करावी व ३० हजार कोटींची लूट वसूल करावी. २००७ पासून खाण घोटाळा झाल्याच्या काळात ज्या राजकीय पक्षांनी खाण कंपन्यांकडून देणग्या स्वीकारल्या, त्या देणग्या नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्य सरकारच्या तिजोरीत जमा कराव्यात, असेही चर्चचे म्हणणे आहे. गोवा सरकारने खाणबाधित लोकांपेक्षा फक्त मायनिंग लॉबीचे हित पाहण्यासाठी प्रयत्न केले. सर्व खाण व्यवसाय बेकायदा ठरल्याने राज्य सरकारने योग्य असा प्रादेशिक आराखडा तयार करायला हवा व त्यात मायनिंगचे क्षेत्र ठरवायला हवे. सरकारने राज्याच्या हितासाठी सार्वजनिक आस्थापनाची स्थापना करून त्याद्वारे खाण व्यवसाय चालवावा, अशीही मागणी चर्चने केली आहे. (खास प्रतिनिधी)