शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
2
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
3
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
4
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
5
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
6
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
7
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
8
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
9
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
10
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
11
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
12
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
13
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
14
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
15
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
16
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
17
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
18
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
19
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
20
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार

...तर बंड मोडून काढले असते!

By admin | Updated: October 7, 2015 01:40 IST

पणजी : गेल्या रविवारपासून खातेबदलाच्या विषयावरून मंत्र्यांमध्ये मोठी धुसफूस झाली. दयानंद मांद्रेकर यांनी तर आक्रमक भूमिका घेतली.

पणजी : गेल्या रविवारपासून खातेबदलाच्या विषयावरून मंत्र्यांमध्ये मोठी धुसफूस झाली. दयानंद मांद्रेकर यांनी तर आक्रमक भूमिका घेतली. मंत्रिमंडळात बंड होते की काय, अशी स्थिती तयार झाली होती. मात्र, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे ठाम राहिले. एखाद्या मंत्र्याने संतापाने राजीनामा दिला असता, तर लगेच अन्य एखाद्या आमदाराचा शपथविधी करून बंड मोडून काढण्याची तयारी भाजपने ठेवली होती, अशी माहिती मिळाली आहे. मंत्र्यांची खाती बदलण्यापूर्वी पार्सेकर यांनी संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली नाही; कारण त्यांच्याशी चर्चा केली असती, तर कदाचित खातेबदल शक्यच झाले नसते. पार्सेकर यांनी पर्रीकर यांच्याशी व भाजपच्या कोअर टीमशी चर्चा केली होती. कुणाचे कोणते खाते काढले जाईल व कुणाला कोणते खाते दिले जाईल, हे भाजपच्या कोअर टीमला ठाऊक होते. रविवारी खातेवाटप केल्यानंतर बंडाची ठिणगी पडण्यासारखी स्थिती निर्माण झाली. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत सोमवारी पर्रीकर यांची भेट घेतली व आपण स्थिती हाताळतो, अशी ग्वाही त्यांना दिली. एखाद्या मंत्र्याने जर निषेधार्थ राजीनामा दिलाच तर काय करावे, याविषयीही पार्सेकर व पर्रीकर यांच्यात चर्चा झाली. मंत्रिमंडळातील जागा एखाद्या नव्या आमदाराच्या सहभागाने लगेच भरून होऊ घातलेल्या बंडातील हवा काढून घ्यावी, असे उच्च स्तरावर ठरले होते. केवळ भाजपच नव्हे, तर काही बिगर भाजप आमदारही मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत व त्यांनाही मंत्रिपद मिळविण्याची घाई असल्याने ते देखील मंत्रिमंडळात सहभागी झाले असते, अशी माहिती मिळाली. (खास प्रतिनिधी)