शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

खरेच नोकऱ्यांचा सेल? विजय सरदेसाईंचे आरोप अन् संपूर्ण राज्याचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2024 13:14 IST

महसूल खात्यात नेमके काय चाललेय हे शोधून काढण्याचे काम मुख्यमंत्र्यांनाही करावे लागेल.

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात कारकून पदांच्या (एलडीसी) भरतीसाठी पैशांची देवाण-घेवाण झाली, असा आरोप विजय सरदेसाई यांनी केला आहे. सरदेसाई हे केवळ आमदार नाहीत, तर ते गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आहेत. शिवाय ते माजी मंत्री व प्रभावी विधिमंडळपटू आहेत. त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे की नाही, हे कळण्यासाठी या एकूण विषयाची चौकशी करून घेण्याचे धाडस मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना दाखवावे लागेल. पूर्ण गोवा आज या विषयाकडे पाहतोय. कारण नोकरभरतीत घोटाळे आणि भ्रष्टाचार होतोय असे गृहीत धरूनच सामान्य माणूस पुढे जात असतो. सामान्य लोकांचा हा समज खोटा की खरा आहे, हे कळायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरू करावी लागेल. 

सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांशी या विषयाबा या विषयाबाबत चर्चा केली आहे. केवळ मीडियामधून आरोप करून सरदेसाई गप्प राहिलेले नाहीत. त्यांनी महसूल खात्याकडे बोट दाखवलेय. शिवाय एक महिला पैसे मागतेय अशा तक्रारी आल्याचेही सरदेसाई यांनी जाहीरपणे सांगितले आहे. एका जबाबदार आमदाराच्या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मुख्यमंत्री सावंत यांनी तर आरोप नजरेआड करूच नये. कारण सरदेसाई यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील भरतीबाबत काय घडले, याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे. 

नोकऱ्या विकण्यात आल्याचे सरदेसाई यांचे म्हणणे ऐकल्यानंतर खरे म्हणजे लगेच मुख्यमंत्र्यांनी चौकशीचा आदेश द्यायला हवा होता, जे नेते जगाला छत्रपती शिवाजी महाराज किंवा रामराज्याच्या गोष्टी सांगतात, त्यांनी तरी लगेच चौकशी करून घ्यायला हवी, अशी जनतेची अपेक्षा असते. निदान सत्य काय ते तरी जगासमोर येऊ द्या.

पार्टी विथ डिफरन्सच्या गोष्टी सांगणारे हे सरकार आहे. मात्र, दुर्दैव असे की गेली काही वर्षे सातत्याने नोकरभरती हा अत्यंत वादाचा विषय बनलेला आहे. यापूर्वीही काही मंत्र्यांवर किंवा त्यांच्या खात्यांवर नोकरभरतीतील भ्रष्टाचाराबाबत आरोप झाले आहेत. आर्थिक गैरव्यवहार होतात, लाचखोरी चालते, नोकऱ्या विकल्या जातात आणि यामुळे गोव्यातील अनेक गुणी उमेदवारांवर अन्याय होतो. मुख्यमंत्री सावंत यांना याविषयी दुःख वाटत असेल असे आम्ही गृहीत धरतो. कारण नोकरभरतीत लाचखोरी झाली तर तक्रार करा, असे आवाहन मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी केले होते. सरकार चौकशी करून घेतेय, दोषींवर कारवाई करतेय असे दिसून आले तरच लोक तक्रारी करण्यास पुढे येतील.

सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांना दोष दिलेला नाही. कारण दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील कारकून भरतीचा विषय थेट त्यांच्या अखत्यारीत येत नाही. तो महसूल मंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रात येतो. बाबूश मोन्सेरात यांनी विजयच्या आरोपानंतर लगेच मीडियाकडे खुलासा केला की- नोकरभरतीत लाचखोरी झालेली नाही, तसे झाल्यास पुरावे द्या. मोन्सेरात यांनी पुरावे मागणे हाच एक मोठा विनोद आहे. नोकरभरतीवेळी समजा पैशांची देवाण-घेवाण झाली तर त्याच्या पावत्या वगैरे फाडल्या जातात काय, असा प्रश्न काही वकीलदेखील सध्या सोशल मीडियावरून विचारत आहेत. खरे म्हणजे सरदेसाई यांच्या आरोपांची चौकशी करा, अशी मागणी मोन्सेरात यांनीच करायला हवी होती. कारण बाबूश पैसे मागतात असे विजयने म्हटलेले नाही. एक महिला पैशांची मागणी करते, असा आरोप फातोड्र्ध्याच्या आमदाराने केला आहे. मग ही महिला कोण आणि कोणत्या उमेदवाराकडे पैसे मागितले, किती पैसे मागितले, नोकरभरती नेमकी कशी झाली, या प्रश्नांची उत्तरे मोन्सेरात यांनी शोधायला हवी होती. त्यासाठी चौकशी करून घ्याच असे मुख्यमंत्र्यांना बाबूशनेच सांगायला हवे होते. उलट पुरावे द्या, असे बाबूशने सांगणे म्हणजे त्या कथित महिलेला अगोदरच क्लीन चीट देण्यासारखे झाले. 

यापूर्वीही काही खात्यांवर व काही मंत्र्यांवर आरोप झाले होते. तीन वर्षांपूर्वी खुद्द मोन्सेरात यांनीही एका मंत्र्यावर गंभीर आरोप करत नोकरभरतीत भ्रष्टाचार झाल्याचा दावा केला होता. दीपक प्रभू पाऊसकर त्यावेळी वादात सापडले होते. त्यावेळी मोन्सेरात यांनी कोणतेच पुरावे दिले नव्हते. आता पुरावे मागण्यापेक्षा मोन्सेरात यांनी चौकशीचा मार्ग खुला करावा. महसूल खात्यात नेमके काय चाललेय हे शोधून काढण्याचे काम मुख्यमंत्र्यांनाही करावे लागेल.

 

टॅग्स :goaगोवाjobनोकरीState Governmentराज्य सरकार