शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
6
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
7
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
10
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
11
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
13
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
14
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
15
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
16
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
17
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
18
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
19
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
20
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

..तर देश देईल ती शिक्षा भोगायला तयार : मोदी

By admin | Updated: November 13, 2016 19:40 IST

काळ्या धनाचा बिमोड करण्यासाठी घेतलेला निर्णय चुकीचा किंवा स्थार्थापोटी असल्याचे सिद्ध झाले तर चौकात उभे करा

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 13 - काळ्या धनाचा बिमोड करण्यासाठी घेतलेला निर्णय चुकीचा किंवा स्वार्थापोटी असल्याचे सिद्ध झाले तर चौकात उभे करा, देश जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे मोपा विमानतळाच्या कोनशीला अनावरणाच्या वेळी म्हणाले. काळे धन, बेईमानी, भ्रष्टाचाराचा गेल्या ७0 वर्षांचा आजार १७ महिन्यात निपटणार, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अस आवाहनही त्यांनी केले. मोदी यांच्या या आवाहनानंतर हजारोंच्या संख्येने उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा गजर केला आणि मोदींना या लढाईत पाठिंबा दर्शविला.काय म्हणाले मोदीजी !- काळे धन उघड करण्यासाठी मुदत दिली होती. व्यावसायिकांनी दंडासमवेत तब्बल ६७ हजार कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा केले. दोन वर्षात सर्वेक्षण, धाडी, घोषणापत्रे या माध्यमातून सव्वा लाख कोटी रुपये तिजोरीत आले. - २ लाखांपेक्षा अधिक रकमेचे सोन्याचे खरेदी केल्यास पॅनकार्ड सक्तीचे केल्यावर निम्म्याहून अधिक खासदार हा नियम लागू करु नका, अशी विनंती करण्यासाठी आले. काही पत्रेही आली ती उघड केल्यास त्यांना त्यांच्या मतदारसंघांमध्ये फिरणेही मुश्कील होऊन बसेल. सराफांची ताकद मोठी आहे. काही खासदार या सराफांच्या खिशात आहेत. - कोणालाही अंधारात ठेवले नाही. काळ्या धनाच्या बाबतीत कठोर कारवाई होणार याचे संकेत मिळावेत, अशा गोष्टी सुरवातीपासून झालेल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत एसआयटी स्थापन केली. जनधन योजनेत गरीबातल्या गरीबाचे बँक खाते खोलून डेबिट कार्डे दिली. तब्बल २0 कोटी लोकांची खाती खोलली. या लोकांनी ४५ हजार कोटी रुपये जमा केले. - बँक कर्मचाऱ्यांवर ताण आला ही खरी गोष्ट त्यासाठी ते अभिनंदनासही पात्र आहेत. वर्षभर केले नाही एवढे काम आठ दिवसात करावे लागले. तडचण झाली परंतु त्याचबरोबर काही निवृत्त बँक अधिकाऱ्यांनीही सरकारचे अभिनंदन करुन आपणहून सेवा देण्याची तयारी दाखवली. - नोटा चलनातून काढल्या हा माझा अहंकाराचा मुद्दा नव्हे. मलाही त्रास झाला. काळा पैसा असेल तर बँकेत भरा, नियमानुसार दंड भरा आणि मुख्य प्रवाहात या, आणि जर का तयारी नसेल तर गाठ माझ्याशी आहे. काळे धन उकरुन काढण्यासाठी लाखभर तरुणांना नोकऱ्या देऊन कामाला लावीन. - काळे धन बाहेर काढण्यासाठीची ही योजना निश्चितच सफल होणार हा विश्वास आहे. देशातील १२५ कोटी जनतेपैकी अवघे काही लाख सोडले तर सर्वजण या निर्णयाच्या पाठीशी आहेत.