शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

..तर देश देईल ती शिक्षा भोगायला तयार : मोदी

By admin | Updated: November 13, 2016 19:40 IST

काळ्या धनाचा बिमोड करण्यासाठी घेतलेला निर्णय चुकीचा किंवा स्थार्थापोटी असल्याचे सिद्ध झाले तर चौकात उभे करा

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 13 - काळ्या धनाचा बिमोड करण्यासाठी घेतलेला निर्णय चुकीचा किंवा स्वार्थापोटी असल्याचे सिद्ध झाले तर चौकात उभे करा, देश जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे मोपा विमानतळाच्या कोनशीला अनावरणाच्या वेळी म्हणाले. काळे धन, बेईमानी, भ्रष्टाचाराचा गेल्या ७0 वर्षांचा आजार १७ महिन्यात निपटणार, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अस आवाहनही त्यांनी केले. मोदी यांच्या या आवाहनानंतर हजारोंच्या संख्येने उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा गजर केला आणि मोदींना या लढाईत पाठिंबा दर्शविला.काय म्हणाले मोदीजी !- काळे धन उघड करण्यासाठी मुदत दिली होती. व्यावसायिकांनी दंडासमवेत तब्बल ६७ हजार कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा केले. दोन वर्षात सर्वेक्षण, धाडी, घोषणापत्रे या माध्यमातून सव्वा लाख कोटी रुपये तिजोरीत आले. - २ लाखांपेक्षा अधिक रकमेचे सोन्याचे खरेदी केल्यास पॅनकार्ड सक्तीचे केल्यावर निम्म्याहून अधिक खासदार हा नियम लागू करु नका, अशी विनंती करण्यासाठी आले. काही पत्रेही आली ती उघड केल्यास त्यांना त्यांच्या मतदारसंघांमध्ये फिरणेही मुश्कील होऊन बसेल. सराफांची ताकद मोठी आहे. काही खासदार या सराफांच्या खिशात आहेत. - कोणालाही अंधारात ठेवले नाही. काळ्या धनाच्या बाबतीत कठोर कारवाई होणार याचे संकेत मिळावेत, अशा गोष्टी सुरवातीपासून झालेल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत एसआयटी स्थापन केली. जनधन योजनेत गरीबातल्या गरीबाचे बँक खाते खोलून डेबिट कार्डे दिली. तब्बल २0 कोटी लोकांची खाती खोलली. या लोकांनी ४५ हजार कोटी रुपये जमा केले. - बँक कर्मचाऱ्यांवर ताण आला ही खरी गोष्ट त्यासाठी ते अभिनंदनासही पात्र आहेत. वर्षभर केले नाही एवढे काम आठ दिवसात करावे लागले. तडचण झाली परंतु त्याचबरोबर काही निवृत्त बँक अधिकाऱ्यांनीही सरकारचे अभिनंदन करुन आपणहून सेवा देण्याची तयारी दाखवली. - नोटा चलनातून काढल्या हा माझा अहंकाराचा मुद्दा नव्हे. मलाही त्रास झाला. काळा पैसा असेल तर बँकेत भरा, नियमानुसार दंड भरा आणि मुख्य प्रवाहात या, आणि जर का तयारी नसेल तर गाठ माझ्याशी आहे. काळे धन उकरुन काढण्यासाठी लाखभर तरुणांना नोकऱ्या देऊन कामाला लावीन. - काळे धन बाहेर काढण्यासाठीची ही योजना निश्चितच सफल होणार हा विश्वास आहे. देशातील १२५ कोटी जनतेपैकी अवघे काही लाख सोडले तर सर्वजण या निर्णयाच्या पाठीशी आहेत.